पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पत्रकारितेचा खंडणीखोर

पश्चिम महाराष्ट् मधील  पत्रकारितेचा  खंडणीखोर  कोण ? याचा शोध कोण घेणार ?  पत्रकारितेचा वापर स्वहितासाठी करणारा बदमाश कोण? याची उतरे कोण देणार ? सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या गावातील पत्रकाराचा प्रश्न आहे ? 

यशवंत ज्योतीचे स्वागत

इमेज
यशवंत ज्योतीचे स्वागत करताना लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील ,नगराध्यक्षा उमा हिंगमिरे , जि .प.च्या सभापती निलमताई पाटील ,रविंद्र बेडकिहाळ ,प्रा. अशोक चव्हाण ,गोरख तावरे ,सचिन देशमुख ,सचिन शिंदे , मोहन कुलकर्णी , राजा मंगसुळींकर ,शरद गाडे, अमोल जाधव,

शिवसेनाप्रमुख यांचे दर्शन घडो !

इमेज
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन देशातील जनतेला  लवकर घडो ! अनेकांचा श्वास त्यांना पाहण्यासाठी  थांबला आहे.तमाम जनता साहेबांचे खणखणीत बोल ऐकण्यासाठी आणि आशीर्वादासाठी मातोश्री बाहेर थांबली आहे.

लक्ष्मिपुत्र दिवाळी अंकाचे प्रकाशन

इमेज
 लक्ष्मिपुत्र दिवाळी अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कराड येथे १३नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.१२८पानांचा अंक आपल्या हाती देताना आनंद होत आहे.यावेळी लक्ष्मिपुत्र चे संपादक गोरख तावरे ,आनंदराव पाटील(नाना) , मदनराव भोसले(दादा ),पत्रकार  सचिन देशमुख ,देवदास मुळे ,बसवेस्वर चेणगे , 
HAPPY DIWALI.  दीपावली शुभेच्छा ! आपल्या जीवनात आनंद सदोदीत राहो,सुख -समृद्धी ,यश प्रत्येक क्षणी आपणास मिळत राहो ही सदिच्छा ! गोरख तावरे ,कराड  ९३२६७११७२१/ ९४२३५०२३५५ laxmiputra.krd@gmail.com

आदर्श पायवाट

इमेज
आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज झाले.यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या कामाची सर्व नेत्यांनी कौतुक केले,आणि आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्याचाच आदर्श ,संयमी ,शांत ,लोकहिताच्या पायवाटेने आमदार बाळासाहेब पाटील यांची वाटचाल सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

दुर्गधी विचारांची लागण

कराड- घरगुती सिलेंडरची दरवाढविरोधात कराडमध्ये बी सी ,ओ बी सी सेलच्यावतीने निदर्शने करण्यात आली ,मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात पत्रकामध्ये मस्ती आल्यामुळे ,  निर्ढावलेल्या अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे केंद्र शासनाने घरगुती सिलेंडरची दरवाढ केली,सामान्य माणूस भरडून जात आहे म्हणून राज्यशासनाने १२ सिलेंडर देण्याची मागणी मंत्री अनिल देशमुख यांनी केली व अर्थंमन्त्री जयंतराव पाटील यांनी सहमती दर्शविली, मात्र निर्ढावलेल्या मुख्यंमत्र्यानी सहानुभूती दाखवली नाही असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस भानुदास माळी यांनी केला आहे सांगा पाहू ,अशा राजकारणी लोकांना  जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावयाची आहे का ?फुकटची प्रसिद्धी हवी ?आपली उंची,आपले पद,म्हणजे जनतेच्या हक्कासाठी मिळालेली जहागिरी आहे?किहीही बोलले,कोणाबद्दलही अपशब्द वापरला तर आपणाला कोणी विचारणार नाही ?अशा खुळचट कल्पनेत वावरणारे ,खुशाल चेंडूं ,राजकीय लोकांना त्यांची जागा ,लायकी जनतेने दाखवायला पाहिजे .माळी नामक लोक  सुंदर बागेची,सुगंधी फुलांची काळजी घेतात ,पण हे माळी...