पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिवाळी अंकांची गोडी कायम रहावी- माजी राज्‍यपाल डॉ. श्रीनिवास पाटील

इमेज
कराड दि.१० (लक्ष्मीपुत्र)   -  दिवाळी अंक हे मराठी भाषेचे अनोखे वैशिष्‍ट्य असून या अंकांचे महत्‍त्‍व आणि गोडी कायम राहण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत ,  असे आवाहन सिक्‍कीमचे माजी राज्‍यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले. दिवा प्रतिष्‍ठान आणि कराडवैभव चॅरिटेबल फाऊंडेशनच्‍या संयुक्‍त विद्यमाने राज्‍यातील दिवाळी अंकांच्‍या संपादकांचे एक दिवशीय अधिवेशन व स्‍व. यशवंतराव चव्‍हाण राज्‍यस्‍तरीय दिवाळी अंक पुरस्‍कार वितरण कार्यक्रम सातारा जिल्‍ह्यातील कराड येथे संपन्‍न झाला. तयावेळी  ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील ,  दिवा प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष विजय पाध्‍ये ,  चंद्रकांत शेवाळे ,  अॅड .  धनंजय सिंहासने ,  शिवाजी धुरी ,  दीपक अरबुणे हे उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी दिवाळी अंकांचे महत्‍त्‍व विशद करतांना सांगितले की ,  मराठी ही एकमेव अशी भाषा आहे की ज्‍या भाषेचे साहित्‍य संमेलन होते ,  नाट्य संमेलन होते ,  काव्‍य संमेलन होते. एखाद्या सणानिमित्‍त विशेष अंक प्रकाशित करण्‍याची शंभर वर्षांहून अधिक जुनी परंपरा मराठी भाषे...