पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दिवाकर रावते यांनी घेतली कणखर भूमिका

इमेज
एसटी महामंडळ अतिशय डबघाईला आले होते. त्याला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न मंत्री दिवाकर रावते यांनी केलेला आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात एसटी बसमध्ये नुकत्याच सापडलेल्या स्फोटकाच्या पार्श्वभूमीवर परिवहन खाते खडबडून जागे झाले आहे. अनेक निर्बंध खाजगी प्रवासी वाहतुकीबरोबरच एस टी महामंडळावरही घालण्यात आलेले आहेत. वास्तविक पाहता शासकीय विभागांमध्ये शिस्त नसते, ती शिस्त आणण्याचा प्रयत्न परिवहन विभागाने केलेला आहे. राज्यातील एसटी बससह खासगी ट्रॅव्हल्स, स्कूल बस, इतर प्रवासी वाहतूक साधने यांच्या सुरक्षीततेसंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये सकारात्मक व सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण आहेत. वास्तविक पाहता हे निर्णय महाराष्ट्रातील तमाम एसटीने अथवा खासगी वाहनाने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी म्हणजेच प्रवाशांना सुखकारक प्रवास व्हावा, यासाठी एसटी महामंडळाची स्थापना झालेली आहे. एसटी महामंडळाच्यावतीने प्रवाशांना सर्वाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्या...

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये कराडकरांनी दिले दाखवून "हम भी कुछ कम नही" कराड नगरपालिकेच्या डोईवर मानाचा तुरा

इमेज
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका राज्यात प्रथम आल्याची बातमी कराडकरांना कळताच कराडकरांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. प्रत्येकाचे अभिनंदन करण्यासाठी एकमेकांचे मोबाईल सातत्याने खणखणत होते. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, राजेंद्रसिंह यादव, माजी आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व आरोग्य विभागातील सेवकांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कराड नगरपालिकेचा राज्यात पहिला क्रमांक आला असून देशातील एक लाख लोकसंख्येच्या चार हजार पेक्षा जास्त नगरपालिकांनी स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. या सर्वांमध्ये कराड नगरपालिकेचा पहिला क्रमांक आला आहे.स्वच्छ "कराड - सुंदर कराड" आणि स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यामुळे कराडकरांचा उर अभिमाना अभिमानाने भरून आला आहे. कराड शहरातील सर्वांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून अपार कष्ट केले, त्याचे चीज झाले असे म्हणावे लागेल.एखादे काम हाती घेतले की कराडकर मागे हटत नाहीत हे एकदा प...

श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कराडमध्ये होणार शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या सन्मान

इमेज
देशाच्या संरक्षणामध्ये जवानांचे अनन्य साधारण महत्व आहे. मिलिटरीमध्ये काम करणारे जवान हे देशाच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या संरक्षणासाठी काम करीत असतात.अत्यंत कठिण परिस्थितीमध्ये व नैसर्गिक आपत्तींचा सामोरे जात आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित राहाव्यात यासाठी जवान जिवाची बाजी लावून काम करतात. त्यामुळेच देशांमध्ये राहणारे नागरिक सुरक्षितपणे आपले जीवन कंठीत असतात.देशाच्या सीमा सुरक्षित असल्या आणि लगतच्या राष्ट्रांकडून देशावर हल्ले होणार नसतील तर देश सुरक्षित राहू शकतो. अन्यथा देशात लगत असणाऱ्या राष्ट्रांनी सीमेलगत काही हालचाली केल्या तर जवानांना त्याच पद्धतीने मुहतोड जवाब द्यावा लागतो. अन्यथा देशाचे संरक्षण धोक्यात येते. यामुळे जवान आपल्या जीवाची बाजी लावून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. सीमा संरक्षण करत असताना अनेक जवानांना आपला जीव गमवावा लागतो. आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. सातारा जिल्हातील अनेक जवान सीमा संरक्षण दलांमध्ये काम करत आहेत. अनेक जवान देशाच्या संरक्षणासाठी कामी आलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील अपसिंगे व तळबीड येथील प्रत्येक ...

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना.... मोफत आरोग्य सुविधा

इमेज
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे हिंदुस्तानला पडलेले सोनेरी स्वप्न आहे, असे म्हणावे लागेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्यातून जाऊन बराच कालावधी गेला मात्र, त्यांच्या स्मृती आजही जागृत ठेवल्या जात आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आहे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असणाऱ्या खात्यामध्ये शिवसेनाप्रमुखांच्या नावाने विविध योजना राबवल्या जात आहे. शिवसेनेची स्थापना सामाजिक कामासाठी झालेली आहे. शिवसेना ही राजकीय संघटना नसून सामाजिक संघटना आहे. शिवसेनेचे काम म्हणजे 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण असे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेली देशातील मराठी माणसासाठी काम करणारी एकमेव शिवसेना संघटना आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा व भीती हिंदुस्तानमधील तमाम नागरिकांना होती. बाळासाहेब ठाकरे यांचा तस्पष्टवक्तेपणा सर्वांना भावला होता. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना राज्य शासनाच्यावतीने प्राथमिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, असा ने...

तंत्रज्ञान आणि भविष्य वेध.... अजिंक्य डी. वाय. पाटील यांच्या विचारातून प्रकट झालेला लेख.....

इमेज
गेल्या काही महिन्यांत झालेल्या मोर्चामध्ये नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवांचा मोठा सहभाग होता. कायम नोकरी मिळावी, म्हणून रेल्वे प्रशिक्षणार्थींनी रेल्वे रोको केलेली कृती असो, एमपीएससी परीक्षा गेली दोन वर्षे न घेतल्याबद्दल आणि रिक्त पदे न भरल्याबद्दल सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली नाराजी असो, किंवा संपूर्ण राज्यभरात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करावी, म्हणून हजारो युवकांनी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा प्रयत्न असो, या साऱ्या आंदोलनातील प्रश्नांचा सामायिक धागा म्हणजे वाढती बेरोजगारी आहे. 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’ च्या अहवालानुसार देशामध्ये सुमारे ३.१ कोटी बेरोजगार आहेत. ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या दरात सतत वाढ होत आहे. देशाच्या ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर वाढला आहे. शेतीविषयक समस्या, कर्जबाजारीपणा, शेती वगळता पर्यायी रोजगाराचा अभाव, यांमुळे ग्रामीण स्तरावरील युवकांची स्थिती बिकट बनली आहे. शेती करून हातात काही येत नाही आणि शेती करण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, अशी त्यांची संभ्रमावस्था झाली आहे. बेरोजगारीसारखा अत्यंत ज्वलंत प्रश्...

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काय झाले ?

इमेज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे  स्मारक अरबी समुद्रामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्न करत आहे. दरम्यान स्मारकाच्या कामाला ज्या प्रमाणात गती हवी होती, ती गती अद्याप मिळालेली नाही. गतकाळातील आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्मारकासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या शासकीय मंजुरी मिळवलेल्या आहेत. आणि समुद्रामधील जागाही निश्चित केलेली होती, परंतु गेल्या साडेचार वर्षांमध्ये शिवस्मारकाचे ज्याप्रमाणात काम झाले पाहिजे होते ते झाले नाही.याची खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसाचे मानबिंदू आहेत." छत्रपती शिवाजी महाराज की जय" असा जयघोष झाल्यानंतर मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभा राहतो.  असे युगपुरुष असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम रेंगाळता उपयोगाचे नाही, अथवा शिवस्मारकाच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारणाचा लवलेशही येता उपयोगाचा नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर अनेक पिढ्या उभ्या राहिल्या आहेत. त्...

अखेर शिवसेना-भाजपा युती झाली हो ! राजकारणामध्ये कोणी, कोणाचा फार काळ मित्र नसतो अथवा शत्रू नसतो

इमेज
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशभरामध्ये राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. लोकसभा निवडणुका कसल्याही परिस्थितीत जिंकायच्याच. असा विडा भाजपाने व काँग्रेसने उचललेला आहे. अशी तयारी काँग्रेस व राष्ट्रवादीने सुरू केली आहे. त्याचप्रमाणे भाजप - शिवसेनेने ही आपली सत्ता कायम ठेवायची यासाठी निर्णय घेतलेला आहे. देशातील प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्तासंपादनासाठी कार्यरत असतो, याशिवाय राजकीय पक्ष जगूच शकत नाहीत. आणि राजकीय पक्षाची निर्मिती झालेली असते, ती म्हणजे केवळ सत्ता संपादनासाठीच. सत्ता असल्याशिवाय जनसामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत. यामुळे देशातील व राज्यातील सत्ता ही आपल्याच राजकीय पक्षाला प्राप्त झाली पाहिजे. यासाठी वर्षानुवर्ष नियोजन केले जाते. वातावरण निर्मिती केली जाते. कारण सत्ता कसल्याही परिस्थितीत आपल्याच पक्षाला मिळाले पाहिजे. यासाठी राजकीय पक्ष वाटेल ते करण्याची तयारी ठेवत असतात. "वाटते ती" म्हणजे कोणताही अनुचित प्रकार न करता लोकशाही मार्गाने दिलेल्या आयुधांचा वापर करून लोकांमध्ये प्रबोधन करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. यात काही गैर आहे, असे म्हणता येणार नाही. ...

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत "ही तर श्रींची इच्छा"

इमेज
मुलायमसिंग यादव यांनी संसदेमध्ये भाषण करताना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे मत व्यक्त केल्याने  सर्वांच्याच भुवया उंच झालेल्या आहेत. या विधानामुळे विरोधकांना धक्काच बसलेलाआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेले काम व हिंदुस्थानचे जगभरामध्ये उंचावलेले नाव वाखाणण्याजोगे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गतकाळात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी यांनी जाहीरनाम्यातद्वारे ज्या घोषणा केल्या होत्या, त्या बहुतांश करून पूर्ण झाल्या आहे. यामुळेच कदाचित मुलायमसिंह यादव यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी मिळावी, असे म्हटलेले आहे. निर्णयक्षम असलेले, खंबीर नेतृत्व करणारे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाने अनुभवलेले आहेत.आजही हिंदुस्थानमधील जनतेच्या मनात नरेंद्र मोदी यांचे अढळ स्थान आहे.भारतीय जनता पार्टीच्यावतीने निवडणूक मैदानात उतरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहेत. देशामध्ये अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते आणि खंबीर नेतृत्वगुण असा...

आता शरद पवार पंतप्रधान होणार ! माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार !

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची बातमी धडकल्यानंतर सर्व राजकीय पक्षांचा अंदाज चुकला की काय ? असे वाटू लागले आहे. कारण शरद पवार यांनी यापूर्वीच "आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही" असे जाहीर केले होते. दरम्यान सध्या देशातील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता, विद्यमान भारतीय जनता पार्टीच्या सरकारला धक्का देण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्यामुळे राजकीय निरीक्षकांनी याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीवरून राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याचबरोबर खुद्द शरद पवार यांनी आपण निवडणूक लढवणार की नाही ? हेही स्पष्ट केलेले नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते मंडळी व माढा मतदारसंघातील मोहिते-पाटील यांनी शरद पवार निवडणूक लढवणार असतील तर आपण निवडणूक लढवणार नाही त्यांचा प्रचार करू असे जाहीर केले आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर देशपातळीवर राजकारणामध्ये शरद पवार यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे....

जलयुक्त शिवार जीवदायिनी म्हणूनच पाण्याचे नियोजन हवे

इमेज
ग्रामीण भागातील प्रमुख उद्योग म्हणून शेतीकडे पाहिले जाते. मात्र शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा राज्य शासनाने दिल्या पाहिजेत आणि त्या देण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. त्याचबरोबर सध्या पाण्याचा प्रश्न सर्वत्र बिकट होत चालला आहे. त्यामुळे शेतीला नियोजनपूर्वक पाणी दिल्यास शेतकऱ्यांमध्ये आर्थिक क्रांती घडू शकते असा विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलेला आहे.ग्रामीण भागातील शेतीचा उत्कर्ष झाला तर शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होईल, मात्र यासाठी शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी नियोजनबद्धरीत्या वाटप झाले पाहिजे. शेतीला मुबलक पाणी मिळाले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये यापूर्वीच पाणीपुरवठा संस्था उभ्या राहिल्या आहेत. अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठा संस्था ह्या कर्ज काढून निर्माण झाले आहेत. तर काही पाणीपुरवठा संस्था डबघाईला आल्याने बंद झालेले आहे.अनेक पाणीपुरवठा संस्था सक्षमपणे सुरू आहेत. त्या शेतकऱ्यांना नियोजनपूर्वक पाणीपुरवठाही करीत आहेत. यामुळे अशा परिसरातील शेती सुजलाम सुफलाम आहे. राज्यातील पाणी पुरवठा संस्थांचा विचार करून राज्य शासनाने पाणीपुरवठा संस्थांना अर्थसहाय्य पुरवठा केला पाहिजे...

काँग्रेसमुक्त भारत झालाच नाही, मात्र प्रियांका गांधी व राहुल गांधीचा करिष्मा दिसू लागला.

इमेज
प्रियंका गांधी सध्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. नुकताच लखनऊ येथे त्यांचा रोड शो झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि प्रियांकाने लखनऊकरांना जिंकले असे म्हणता येईल. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी नुकतीच प्रियंका गांधी यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर पहिल्यांदाच प्रियांका गांधी यांनी लखनऊ येथे उत्तर प्रदेशचा दौरा केला. यामध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो हिट ठरला आहे. प्रियांका गांधी यांचे पुनश्च राजकारणात झालेले आगमन हे सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी होऊ शकते. कारण प्रियांका गांधी यांचा चेहरा देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याशी साधर्म्य आहे. म्हणजेच प्रियांका गांधी या इंदिरा गांधी यांची नात आहे. हिंदुस्तान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा उल्लेख होतो. त्याचबरोबर देशाची खणकर महिला म्हणून इंदिरा गांधी यांच्याकडे पाहिले जात आहे. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि महिलाही देश चालवण्यामध्ये कोठे कमी नाहीत ! हे जगाला दाखवून दिलेले आहे. रोड शो करून जनतेमध्ये सामील होण्याच...

लोकसभा - विधानसभा एकत्र होणार ? यूती का आघाडीचे सरकार येणार ?

इमेज
आगामी लोकसभा - विधानसभेचे रणसिंग वाजू लागले आहे. वास्तविक पाहता पहिल्यांदा लोकसभा निवडणुका होतील ! त्यानंतर विधानसभांच्या निवडणुका होतील ! असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभा व विधानसभा एकत्रित होतील असा अंदाज व्यक्त केल्यामुळे निवडणुका नक्की कशा होणार ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा-विधानसभा निवडणूका एकत्र व्हाव्यात अशी बहुदा कॉंग्रेसची इच्छा आहे. दरम्यान सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट झालेली नाही. कारण प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते आपले वेगवेगळे भाकित करीत असल्यामुळे नक्की निवडणुका कंधी होणार ? हा प्रश्न मतदारांना पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी मतमतांतरे व्यक्त केल्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा व विधानसभा एकत्रित निवडणुका होणार की वेगवेगळ्या ! याबाबत अद्याप निवडणूक आयोगाने कोणतेही स्पष्टता स्पष्ट केलेली नाही.यामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपल...

"गरीबी हटाव"ला सुरुवात, आता गरिबांना मिळणार घरे

इमेज
महाराष्ट्रामध्ये अनेक नागरिक घर नसल्यामुळे बेघर आहेत.गरिबीचे चटके सहन करत उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांची अवस्था अत्यंत वाईट व बिकट आहे.जन्मजातच गरिबी आली अथवा प्रासंगिक कारणास्तव गरिबीमध्ये दिवस कंठत आहेत, अशा काही नागरिकांनी घर नसल्या कारणामुळे महानगरपालिका, नगरपालिकांच्या जमिनीवर अतिक्रमण करून झोपड्या, घरे बांधून निवारा प्राप्त केलेला आहे. या जागेवर राहणाऱ्या नागरिकांना कोणताही आधार नाही, ते निराधार आहेत. याचा विचार करून नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना कायमस्वरूपी घर देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो गरिबांसाठी दिलासादायक व आनंदाचा निर्णय आहे असे म्हणावे लागेल. महापालिका, नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी जमिनी आहेत.दरम्यान सदर जमिनींचा कोणताही वापर झाला नसल्यामुळे अशा जमिनी मोकळ्या राहिल्यामुळे या जागांवर अतिक्रमणे करून घरे बांधून गरीब लोक आपला संसार करीत आहेत. या जमिनीवर बांधण्यात आलेली घरे अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महानगरपालिका, नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधून र...

अंथरूण पाहून पाय पसरायला हवेत ! भौतिक सुख वस्तूंचे आकर्षण

इमेज
आज प्रत्येकाला भौतिक सुखाची आस लागून राहिलेले आहे. भौतिक सुख हे आज जीवनाचे अंतिम ध्येय आहे की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण शेजारच्या घरांमध्ये कोणत्या भौतिक वस्तू आहेत, त्या आपल्याकडे असाव्यात ? असा विचार सध्या समाजामध्ये प्रकर्षाने प्रकट होत असतो. आपल्या शेजाऱ्याकडे ज्या वस्तू आहेत त्या आपल्याकडे हव्यात, असा हव्यास अनेकांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. मात्र आपल्या कमाईच्या किती बाजू आहेत ? आपला दैनंदिन आर्थिकस्तर काय आहे ? याचा विचार न करता भौतिक गोष्टींचा वापर होत असल्याने अनेकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असला तरी सुख वस्तूंचा उपभोग घेण्याकडे कल मात्र कमी होताना दिसून येत नाही. त्याचबरोबर घर, बंगला, गाडी हा हव्यास फार मोठ्या प्रमाणात सर्वत्र दिसून येत आहे. घरामध्ये सर्व भौतिक सुविधा हव्या, त्याचबरोबर आपल्या आलिशान बंगला व घरासमोर चारचाकी वाहन हवे, ही मानसिकता दिसत असली तरी आपली कमाई किती आहे? त्यानुसार आपले राहणीमान असायला हवे, हा विचार होतो आहे की नाही ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.सहकार क्षेत्रामध्ये असणाऱ्या सहकारी बॅंका, पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका यांचा व्याजदर...

समाजाच्या हक्कासाठी अण्णा हजारेंना उपोषण करावे लागते, मग सरकार काय करते ?

इमेज
अण्णा हजारे यांनी उपोषण करून ज्या मागण्या केल्या होत्या ते मान्य केल्यानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले आहे. वास्तविक पाहता देशभरामध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांना समाज मान्यता आहे. कारण समाजाच्या हितासाठी, समाजाच्या उत्कर्षासाठी, समाजाच्या कल्याणासाठी अण्णा हजारे आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. वास्तविक उपोषण करणे म्हणजे गांधी मार्गाने लोकशाहीतील हक्क मागण्याचा एक सुलभ मार्ग आहे. देश स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्ये महात्मा गांधी यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारून इंग्रज सत्तेला हादरवून सोडले होते. शांततेच्या व लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करून आपणाला हव्या असणाऱ्या मागण्या मान्य करून घेण्याचा हा एक मार्ग आहे. वास्तविक देशाची सध्याची अवस्था बिकट आहे. समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्न सोडवले पाहिजेत, यासाठी शासनाची मानसिकता ही सकारात्मकता हवी, कारण केंद्रात व राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार असले तरी समाजाच्या हिताच्यादृष्टीने घ्यावे लागणारे निर्णय संबंधित सरकारने घेतले पाहिजेत. सध्या राज्य व केंद्रमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आणि विकासाच्या बाबतीत आ...

काँग्रेस पक्षाला येत आहेत अच्छे दिन / मलकापूर नगरपरिषदेवर काँग्रेसचाच झेंडा. . .

इमेज
सातारा जिल्ह्यातील नव्याने मंजूर झालेल्या मलकापुर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली, या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षसह 15 जागांवर विजय मिळवला तर भारतीय जनता पार्टीला 5 जागा मिळाली आहेत. गत लोकसभा निवडणुकीपासून देशात मोदींची लाट व भारतीय जनता पक्षाची सत्ता सर्वत्र येत आहे, असे चित्र होते. दरम्यान तीन राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्यापासून सर्वत्र काँग्रेसचा विजय होत आहे, असे चित्र दिसून येत आहे.मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. कारण मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते. दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापुर नगरपरिषद महत्त्वाचे आहे. यामुळे या निवडणुकीकडे केवळ सातारा जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या गटांमध्ये मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक झालेली आहे. अपवाद अपक्ष उमेदवारांचा सोडता एक ते नऊ प्रभाग...

ज्येष्ठ संपादक, पत्रकार हालाखीचे जीवन कंठताहेत त्यांच्यासाठी आशेचा किरण

इमेज
“आचार्य बाळशास्त्री जाांभेकर पत्रकार सन्मान” योजना ज्येष्ठ पत्रकारांसाठी सकारात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ संपादक, पत्रकारांना यांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. कारण गेल्या तीस वर्षांपासून अधिक काळ व 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे महाराष्ट्रमध्ये अनेक संपादक, पत्रकार आहेत. “आचार्य बाळशास्त्री जाांभेकर पत्रकार सन्मान” योजनेस मान्यता मिळालेले आहे. सदरची योजना ज्येष्ठ पत्रकारांसाठी आहे. ही योजना मंजूर करावी यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी सकारात्मक प्रयत्न केलेला आहे. वास्तविक महाराष्ट्रामध्ये पत्रकार व संपादकांच्या अनेक संघटना आहेत. प्रत्येक संघटनेने यासाठी प्रयत्न केला आहे. यामुळे एकाच संघटनेला या कामाचे श्रेय देता येणार नाही. ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळावी अशी प्रथम मागणी करण्यात आली होती. मात्र सध्या पेन्शन कोणालाही दिली जात नसल्यामुळे सदर पत्रकारांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी पत्रकार सन्मान योजना असे नाव देण्यात आलेले आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने सदरची योजना सुरू करण्यात आल...

पांढरेपाणी गाव सुविधांपासून वंचित . . . पांढरेपाणी गावाला काळ्यापाण्याची शिक्षा

इमेज
पुरोगामी महाराष्ट्रमध्ये अनेक खेडेगावांचा समावेश होतो. त्याचबरोबर अनेक तालुके हे दुर्गम डोंगराळ व दुष्काळग्रस्त आहेत. त्याचबरोबर अनेक गावांची नावे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही वेळेला गावांच्या नावाने हास्यविनोद होतो तर काही गावांची नावे घेताना लज्जा निर्माण होते. वास्तविक पाहता याठिकाणी गावांचा नावांचा उल्लेख करणे फार महत्त्वाचे नाही. महाराष्ट्राच्या इतिहास पाहत असताना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एका गावाचा उल्लेख करून त्याबाबत लिहिणे अपेक्षित आहे. पाटण तालुका डोंगराळ, दुर्गम म्हणून परिचित आहे. पाटण तालुक्याच्या विकासासाठी विद्यमान आमदार शंभूराज देसाई सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्याचबरोबर गतकाळामध्ये पाटण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे आदरणीय विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटणच्या विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. वास्तविक पाहता आदरणीय विक्रमसिंह पाटणकर सध्या राजकारणापासून चार हात लांब राहिले आहेत. राजकारणाचा संन्यास घेतला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण आदरणीय विक्रमसिंह पाटणकर यांचा नुकताच अमृतमहोत्सवी सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. तर लोकनेते बाळासाहेब...