पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
मोर कावळा (गोरख तावरे) पाण्याचा वाहता प्रवाह अन् हिरवीगार झाडी मनाला मोहीत करत असते.श्रावन संपला आणि बरेच दिवस रखडलेली पार्टी कुठे करायची याचे चर्वित चर्चा झाली.अखेर चांदोली धरणाच्या पायथ्याशी जाण्याचे निश्चीत आहे.कडक श्रावणाच्या पर्वनीला पुर्णविराम देवून रंगीत संगीत पार्टीत मनमुराद आनंद लूटता आला.यात काय विशेष. असेच वाटेल,विशेष तर आहे म्हणूनच तर अनुभव सांगणेचा मोह आवरता येत नाही.चांदोली परिसरात गेल्यानंतर गर्द हिरव्या झाडीने मन आनंदी तर झालेच पण मोरांच्या दर्शनाने आनंद द्विगुणीत झाला.चांदोलीच्या निसर्गात मन प्रसन्न झाले.वाहत्या पाणी प्रवाहाच्या कडेला आमची मैफील स्थानापन्न झाली आणि मोर मनाच्या हिंदोळयावर नाचत असतानाच आमच्या सहभोवती काळया कावळयांनी रिंगणच केले.काव काव करीत राहिल्याने आम्हा सर्वांचे लक्ष त्यांचेकडे गेले.अरे वा पहा कावळे .....इकडे तिकडे चोहीकडे पहावे तिकडे कावळेच कावळे..! तेव्हा हे कावळे पुराण होते असे. तसा हा अनुभव वेगळा,कावळेच कावळे आपल्या शेजारी असताना त्यांचे कोण बरे कौतुक करेल.आमचेकडे फरसाना होता.एका मित्रांने उत्सुकते कावळयांना फरसाना खाण्यासाठी फेकला तर सर...

मृदू भाषीक - अविनाशदादा मोहिते

इमेज
"कृष्णा"निवडणूक भाग - 3 मृदू भाषीक - अविनाशदादा मोहिते (गोरख तावरे) कृष्णा सहकारी साखर कारखाना उभारणीत जेष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते व सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांचा सिंहाचा वाटा आहे.त्याचबरोबर या दोन्ही बंधूंच्या खांदयाला खांदा लावून तत्कालीन संस्थापक संचालकांचाही वाटा आहे.हा इतिहास आता कोणी विसरणार नाहीत कारण कृर्षीमहर्षी आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते यांनी गतकाळातील कृष्णा निवडणूकीत संस्थापक पॅनेल उभे करून कृष्णेत सत्तांतर घडवले आणि अख्या महाराष्ट्राने "हे अंचिबीत व विपरीत काय घडले"असा प्रश्न केला."कोण आहे हा अविनाश मोहिते" मोहिते-भोसले ताकदीला आव्हान देणारा म्हणून अविनाश मोहिते यांना पाहण्याची अनेकांना उत्सुकता लागली होती. शांत,संयमी,मृदू भाषीक असे अविनाशदादांचे व्यक्तीमत्व आहे.घराण्याला परंपरा असूनही कराड तालुक्याच्या राजकारणात आबासाहेब मोहिते घराण्याला काही महत्व नव्हते.कृष्णा कारखाना उभारणीत आबासाहेबांचाही पुढाकार होता मग आमचे मोहिते घराणे कराडच्या व कृष्णा कारखान्याच्या दैनंदिन कामकाजापासून लांब का ? असा प्रश्न अविनाशदादांन...

लढवय्या नेता - मदनरावदादा मोहिते

इमेज
कृष्णा निवडणूक भाग - 2 लढवय्या नेता - मदनरावदादा मोहिते (गोरख तावरे) कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक,जेष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी दूरदूष्टीकोण नजरेसमोर ठेवून कृष्णा कारखान्याची स्थापना केली.राज्याच्या मंत्रीमंडळात अभ्यासू मंत्री म्हणून भाऊंची ख्याती होती.सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करता येतो.तो ही आखीव - रेखीव हे आपल्या कृतीतून त्यांनी दाखवून दिले आहे.महाराष्ट्राचे जेष्ठ विचारवंत म्हणून यशवंतराव मोहिते (भाऊ)यांचा आदर केला जायचा.याचा रास्त अभिमान कराड तालुक्याला आहे.याच मुशीत व विचारात घडलेले मदनरावदादा मोहिते आहेत.भाऊंच्या विचार वाटेवरून तसूभरही मदनरावदादा कधीही विचलीत झाले नाहीत."कृष्णा"च्या पहिल्या सत्तांतरानंतर व भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मदनरावदादा पहिल्यांना "कृष्णा"चे अध्यक्ष झाले.याच काळात यशवंतरावभाऊ व जयवंतरावआप्पा या दोन सख्या भावांमधील वैचारीक संघर्ष अख्या महाराष्ट्राने पाहीला आहे. मदनरावदादा हे स्पष्ट व्यक्ते अशी त्यांची ओळख आहे.भाऊंनी आखून दिलेल्याच सहकारांतील तत्वाप्रमाणे काम करीत होते.ऊसउत्पादक शेतक-यांच्...

डाॅ.सुरेश भोसले आधुनिकतेचा नेता

इमेज
डाॅ.सुरेश भोसले आधुनिकतेचा नेता (गोरख तावरे) सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांनी सहकार क्षेत्रात जे सामान्य शेतकरी व शेतक-यांच्या मुलांसाठी केलेले काम अतुलनीय आहे.30 वर्षे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील शेतक-यांचे जीवनमान उंचवावे,आर्थिक सुबत्ता यावी यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले आहे.याचा विसर कार्यक्षेत्रातील सभासदांना पडता उपयोगाचा नाही.अनेक आरोपांचा सामना करीत जयवंतराव भोसले यांनी कल्पकतेने भागाचा विकास करताना सहकाराचा चांगला उपयोग केला आहे.राजकीय मतभेदापलीकडे विचार करून जयवंतरावआप्पांनी शेतीला पुरक अनेक संस्था उभ्या केल्या आहेत.हे सांगण्याचा हेतु काय ? तर सध्या कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीचा राजकीय धुरळा उडू लागला आहे. जयवंतरावआप्पांच्या पश्चात डाॅ.सुरेश भोसले त्याच मार्गाने वाटचाल करीत आहेत.शांत,संयमी व्यक्तीमत्व म्हणून सुरेशबाबांकडे पाहिले जाते.कृष्णाच्या गतकाळात अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना सुरेशबाबांनी "कृष्णा"ला आधुनिकतेची जोड दिली.नविन तंत्रज्ञानाचा स्विकार केला.भागात उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्दतेसाठी शिक्षणांचे विविध विभाग व ...

कला अकादमीवर कराडच्या मंगला बनसोडे यांची निवड

इमेज
कला अकादमीवर कराडच्या मंगला बनसोडे यांची निवड कराड दि22 (सावा) तमाशाच्या लोककलेला आपल्या सर्व कुटुंबानेच वाहून घेतले आहे. गेली ५५ वर्षे आपण या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील झाडाखालच्या तमाशापासून ते नाट्यगृहातील तमाशापर्यंत तमाशा मंडळे व त्यामधील कलाकारांना कोणत्या अडी-अडचणी येत असतात. त्यांच्या समस्या काय आहेत, याची आपणास माहिती आहे. या समस्या सोडविण्याला व तमाशा कलावंतांना मान-सन्मान प्राप्त करून देण्याला आपण समितीच्या माध्यमातून प्राधान्य देणार आहे. राज्यभरातील तमाशा कलावंत व शासन यांच्यामधील दुवा म्हणून आपण समितीमध्ये काम करणार आहे. त्यामुळे खर्‍या-खुर्‍या तमाशा कलावंतांना आपण न्याय मिळवून देऊ, असे मंगला बनसोडे-करवडीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आपल्या स्वत:च्या तमाशाव्दारे यावर्षीपासून 'लेक वाचवा' या विषयावर वगनाट्य सादर करून आपण राज्यभरात लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नितीन बनसोडे व अनिल बनसोडे-करवडीकर उपस्थित होते.राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाअंतर्गंत स्थापन करण्यात आलेल्या पु. ल. देशप...

संपादक-प्रकाशकांनी ऑनलाईन फाॅम भरावा - गोरख तावरे

इमेज
संपादक-प्रकाशकांनी ऑनलाईन फाॅम भरावा - गोरख तावरे कराड दि.(सावा) केंद्र शासनाच्या आरएनआय ला महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांनी प्रतीवर्षाप्रमाणे वार्षीक विवरण पाठवणे आवश्यक आहे.सध्या ऑनलाईन वार्षीक विवरण भरावे लागणार आहे.31 मे 2015 अंतीम तारीख आहे.तेव्हा दैनिक,साप्ताहिक,पाक्षीक,मासिक आणि अन्य प्रकाशित होणा-या वृत्तपत्रांच्या संपादक,प्रकाशकांनी वार्षीक विवरण ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.असे प्रसिध्दीपत्रकात प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे यांनी म्हटले आहे. www.rni.nic.in  या वेबसाईटवर ऑनलाईन फाॅर्म उपलब्द  आहे.काही अडचण आल्यास गोरख तावरे (9423502355 / 9326711721) यांच्याशी संपर्क साधावा विनामोबदला सहकार्य केले जाईल अशी हमी देवून पत्रकात म्हटले आहे की,काही तथाकथीत व्यक्ती संपादक व प्रकाशकांना फसवून ऑनलाईन फाॅर्म भरण्यासाठी पैशाची मागणी करीत आहेत यापासून सावध रहावे.विनाशुल्क ऑनलाईन फाॅर्म भरता येतो लेखा परिक्षकांचे पत्र सोबत जोडणे, अंक विक्रीची माहिती आवश्यक आहे.असेही पत्रकात म्हटले आहे.

३५0 रूपये कमी देणार्‍यांनी ऊस दरातील फरकाबद्दल बोलू नये - अविनाश मोहिते

इमेज
३५0 रूपये कमी देणार्‍यांनी ऊस दरातील फरकाबद्दल बोलू नये - अविनाश मोहिते कराड -कारखान्याच्या इतिहासात या पाच वर्षात सभासदांना मालकाचा दर्जा दिला.४८ हजार सभासदांना २ रु. किलो दराने साखर देणारा कृष्णा कारखाना एकमेव असून शेजारच्या कारखान्यापेक्षा ३५0 रुपये दर कमी देणार्‍यांनी ऊस दरातील फरकाबद्दल बोलू नये, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा कारखान्याचे चेअरमन अविनाश मोहिते यांनी केले. कार्वे, कोडोली (ता.कराड) येथे झालेल्या सभासद संपर्क दौर्‍यात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते अँड़ बाळासाहेब शेरेकर, कृषिमित्र अशोकराव थोरात, कारखान्याचे संचालक पोपटराव जाधव, जयशंकर यादव,उपस्थित होते. अविनाश मोहिते म्हणाले, १९८९ पासून कारखान्याचा कारभार सभासदांनी तपासून पहावा. सभासदांना सन्मानाची वागणूक कोणी दिली. २ रुपये दराने देण्यात येणारी साखर १४ रुपये दराने कोणी केली. इरिगेशन योजनांना १६ तास अखंडीत वीज कोणाच्या काळात मिळाली. कारखान्याच्या मालकीची १५७ एकर जमीन लाटण्याचा कोणी प्रय▪केला. सभासदांना दीर्घ आजारासाठी मदत कोणी दिली. इतर कारखान्याच्या बरोबरीत ऊस दर कोणी दिला. १00 रुपये फाइनल बिल कोणी बुडविले. या सर...

सामाजीक बांधिलकीतून प्रधानमंत्री जीवन सुरक्षा आणि जीवन ज्योती राबवणार - राजेश पाटील

इमेज
सामाजीक बांधिलकीतून प्रधानमंत्री जीवन सुरक्षा आणि जीवन ज्योती राबवणार - राजेश पाटील कराड(सावा)- कराड जनता बँकेने आपल्या सभासद आणि ग्राहकांसाठी अनेक योजना आणि उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविले आहेत. देशभरातील सर्वसामान्य नागरीक आणि शेतकरी बांधवांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या दोन्ही योजना कराड जनता बँक आपल्या सुमारे दीड लाखाहून अधिक ग्राहक आणि सभासदांसाठी प्रभावीपणे राबविणार आहे. नाममात्र किमतीमध्ये ही योजना विमाधारकांच्या कुटूंबांसाठी एक प्रकारचे दिलासा देणारे सुरक्षाकवचच असून विमा योजनांचा लाभ सर्वांनी बँकेच्या जवळच्या शाखेतून घ्यावा, असे आवाहन कराड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर यांनी केले. बँकेच्या मुख्य कार्यालयात या दोन्ही विमा योजनांचा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, उपाध्यक्ष विकासराव धुमाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विलासराव सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. विलासराव सुर्यवंशी यांनी विमा योजनांची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, प्रधानमंत्री जीवन सुरक्...

कृष्णा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.अतुल भोसले

इमेज
कृष्णा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.अतुल भोसले कराड, ता. 21 (सावा)कृष्णा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले, उपाध्यक्षपदी दामाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या मुख्य कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी एस. टी. गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडी जाहीर करण्यात आल्या. नूतन चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी सभासदांनी दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल आभार मानताना; कृष्णा बँकेला देशातील अग्रगण्य बँकेचा बहुमान पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय व्यक्त केला. कृष्णा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये नूतन संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून डॉ. अतुल भोसले, दामाजी मोरे, शिवाजी थोरात, प्रदीप थोरात, हर्षवर्धन मोहिते, प्रमोद पाटील, हणमंत पाटील, बाळासो पवार, रणजीत लाड, महादेव पवार, चंद्रहास जाधव, नामदेव कदम, महिला गटातून मालन जगताप,नंदाताई थोरात, अनुसूचित जाती गटातून तातोबा थोरात, विमुक्त जाती गटातून दिनकर गडाळे,इतर मागासप्रवर्गातून संतोष पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेचे मार्गदर्शक संचालक डॉ. सुरेश भोसले यांच्य...

...तर कृष्णेची चार स्वतंत्र युनिट असती! : डॉ. सुरेश भोसले

...तर कृष्णेची चार स्वतंत्र युनिट असती! : डॉ. सुरेश भोसले कराडदि (सावा)कृष्णा कारखान्यावर  योग्य नियोजन झाले असते तर गेल्या दहा वर्षांत कृष्णेचे नवीन युनिट स्थापन होऊन चार कारखाने झाले असते. इतकेच नव्हे, तर जरंडेश्‍वर आणि रयत साखर कारखानाही कृष्णेनेच चालविला असता; ते बंद पडू दिले नसते, असे मत कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन आणि सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केले. वाटेगाव (ता. वाळवा) येथे कृष्णा कारखाना सभासद व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बी. डी. पाटील होते. शेतकरी सभासदांना मार्गदर्शन करताना डॉ. भोसले म्हणाले, की ढिसाळ नियोजनामुळेच कृष्णा कारखाना सध्या अडचणीत आला आहे. कारखान्यावर जर चांगले नियोजन झाले असते तर कारखान्याचे विस्तारीकरण होऊन शाखा झाल्या असत्या. 1999 साली आम्ही सत्तेवर आल्यावर कारखान्याचा विस्तार केला. पण त्यानंतर मात्र कारखान्यावर आलेल्या सत्ताधार्‍यांनी मात्र कारखान्याचा कोणताही विस्तार न केल्यास कारखान्याची प्रगती खुटली आहे. आम्ही निवडणुकीत उतरलो कारण गेल्या काही वर्षात कारखाना अडचणीत आला आहे. प्रशासन कोलमडले ...

सातारा जिल्हयात राजकीय वातावरण तापले

सामना - 3/5/2015 कराड वार्तापत्र - गोरख तावरे सातारा जिल्हयात राजकीय वातावरण तापले सातारा जिल्हयात सध्या जिल्हा मध्यवर्ती बॅक निवडणूक,आगामी कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक,पालकमंत्री विजय शिवतारे यांचा शिवसैनिकांना पांठीबा व दिलासा आणि शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचा युती शासनाच्या माध्यमातून विकासाचा नवा आयाम अशा विविध घडामोडीमुळे राजकीय वातावरण गतीमान झाले आहे.बेरजेचे राजकारण व शह- काटशह आणि आरोप-प्रत्यारोंपाचा माहोल जोरदार सुरू आहे. जिल्हा बॅकेच्या संचालक पदासाठी वजनदार राजकीय लोकांनी प्रतिष्ठापणाला लावली तर सत्तेत आपणच कायम पाहिजे यासाठी तडजोडी केल्या पक्षीय मुखवटे बाजूला सारले गेले तर राष्ट्रवादीने निष्ठावंताना बाजूला ठेवले.जेष्ठ नेते विलासकाका पाटील यांच्या अधिपत्याखाली असणारी जिल्हा बॅक राष्ट्रवादीने ताब्यात घेतल्यापासून रामराजे निंबाळकर व लक्ष्मणतात्या पाटील संयुक्त नेतृत्व करीत आहेत.यावेळी श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी नवोदितांना संधी देण्याची भूमिका घेतल्याने प्रस्तापितांच्या 'असे काही नको'या भूमीकेमुळे काही जागा बिनविरोध झाल्या आहेत.बैठका, चर्चा मनधरणी ...

"सह्याद्री"च्या गुलालानंतर "कृष्णा"ची रणधुमाळी सुरू

सामना - 25/3/2015 (गोरख तावरे) कराड उत्तरमधील "सह्याद्री"सहकारी साखर कारखान्याची सत्ता आमदार बाळासाहेब पाटील यांच्याच हाती कायम ठेवण्याचा निर्णय शेतकरी सभासदानी घेतला आहे."सह्याद्री"चा गुलाल हे बेरजेच्या राजकारणाचा व यशवंतराव चव्हाण व पी.डी.पाटील यांच्यासह आमदार बाळासाहेब पाटील नेतृत्वावरील विश्वास आहे.दरम्यान दक्षिणमधील "कृष्णा"साखर  कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली आहे.गटा-तटात व सग्यासोय-यातील आता धुमचक्री सुरू होणार आहे.सत्ताधारी अविनाश मोहिते असून मदनदादा माहिते,डाॅ.इंद्रजीत मोहिते आणि डाॅ.अतुल भोसले,माजी आमदार विलासकाका पाटील अशा तीन पॅनेलमध्ये सत्ता संघर्ष होण्याची शक्यता आहे. "सह्याद्री" शांत झाला असून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा बिगुल वाजला आहे. तिरंगी लढत निश्‍चित मानली जात आहे. यासाठी कराड, वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस या तालुक्यांतील कार्यक्षेत्रातील राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहेत.भौगोलीक परिस्थिती विभिन्न् असली तरी शेतकरी सभासदांच्या हितासाठी आमदार व ताकदवान राजकीय नेते "कृष्णा"च्या आखाड्यात उतरत अ...

कराडचा कलंक पुसायचाय - पृथ्वीराज चव्हाण

कराड दि.23(सावा)संवेदनशील शहर म्हणून निर्माण झालेली कराडची ओळख आपल्याला पुसायची आहे. सर्वांनी एकजुटीने राहू कराड दि.23(सावा)संवेदनशील शहर म्हणून निर्माण झालेली कराडची ओळख आपल्याला पुसायची आहे. सर्वांनी एकजुटीने राहून शहराच्या नावलौकिकात भर घालणे गरजेचे आहे असे मत माजी मुख्यमंत्री,आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. कराड शहर पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, भाजपाचे भरत पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह नागरिक, विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘यापूर्वी झालेल्या काही दुर्देवी घटनांमुळे कराडची ओळख संवेदनशील शहर अशी झाली आहे. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. त्यामध्ये नागरिकांचा मोठा वाटा आहे. कराडचा नावलौकिक वाढून शहराच्या वैभवात भर पडावी, यासाठी आपण मुख्य...

सह्याद्रीची सांगता सभा

कराड-केंद्र व राज्य सरकार साखर उदयोगाला मदत करत नाही.साखर कारखानदारी अडचणीत आहे.ऊसाला दर मागणारे आता देणारे झाल्याने शेतक-यांच्या अपेक्षा वाढल्या आहेतःआमदार बाळासाहेब पाटील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी पी.डी.पाटील पॅनलचा प्रचार सांगता सभा मसूर (कराड) येथे पार पडली.आमदार बाळासाहेब पाटील यांनी आपल्या कामाचा आढावा घेवून विरोधकांच्या आरोपांची उत्तरे दिली.तर काहींचा खरपूस समाचारही घेतला.माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार आमदार आनंदराव पाटील यांनी पी.डी.पाटील पॅनलला पांठीबा तर दिलाच आहे.पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक मसूरच्या सभेला उपस्थितीत राहून त्यांनाही विरोधकांच्या कामकाजावर आसूड ओडले. 17 मार्चला मतदान होणार असून 19 मार्चला निकाल जाहीर होणार आहे.

सोपानराव घोरपडे यांचा सन्मान होणार

कराड - गंगारामजी गुजर उर्फ भाई यांच्या 26 व्या पुण्यस्मरणानिमित्त स्वा.सै.सोपानराव घोरपडे यांना "स्वा.सेनानी भाई गुजर पुरस्कार" देवून आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याचे डाॅ.अशोक गुजर यांनी सांगितले. डाॅ.दौलतराव आहेर काॅलेज ऑफ इंजिनिअरींग,बनवडी-कराड येथे 15मार्च रोजी 11 वाजता समारंभ होणार आहे.

महाराष्ट्राला गरज स्वतंत्र पत्रकारिता विद्यापीठाची

पत्रकारितेचे सर्वोच्च शिक्षण घेवून या क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम करणारे अनेक इच्छुक तरुण या महाराष्ट्रात आहेत. पत्रकारितेचा अभ्यासक्रम चालवानारे १९ विद्यापीठ महाराष्ट्रात उपलब्ध आहेत, या विद्यापीठांच्या अंतर्गत शंभरपेक्षा अधिक महाविद्यालये आणि अभ्यासकेंद्रतुन पत्रकारिता पदविका,पदवी आणि पदविवोत्तर स्तरावरचे शिक्षण दिले जाते. विद्यापीठातील पत्रकारिता शिक्षण अभ्यासक्रमास अनुदान आहे, परंतू राज्यातील १९ विद्यापीठा अंतर्गत पत्रकारिता अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांना अनुदान उपलब्द नाही. तंत्र विद्यापीठ,कृषी विद्यापीठ,कायदा (लॉ) विद्यापीठ,आरोग्य विज्ञान विद्यापीठ यासह महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता विद्यापीठ” स्थापन व्हावे यासाठी महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटनांनी अनेक वेळा शासनाकडे मागणी केली आहे. पत्रकारितेतील अभ्यासक्रमाचा दर्जा उंचावण्यासाठी, पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्याना तसेच माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराना उच्च शिक्षणाची संधी निर्माण होण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये व...

"सह्याद्री"निवडणूक प्रचाराला वेग

दैनिक सामना   13/3/2015-गोरख तावरे "सह्याद्री"निवडणूक प्रचाराला वेग कराड दि.11(सावा)सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आदरणीय पी.डी.पाटील पॅनेलला म्हणजे सत्ताधारी गटाला   ‘कपबशी’ तर यशवंतराव चव्हाण शेतकरी पॅनेलला ‘विमान’ चिन्ह मिळाले आहे.सत्ताधारी व विरोधकांनी प्रचार सभांवर जोर दिला आहे. १७ मार्चला मतदान व 19 मार्चला निकाल लागणार आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील हे शांत व संयमाने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. साखर कारखान्यांची निवडणूक असूनही दोन्ही बाजूने आक्रमक प्रचार केला जात नाही पण आपली भूमिका व शेकत-यांचे हित कसे पाहतो ?हे मुद्दे सभासदांपर्यंत कसे पोहचतील हे पाहिले जात आहे.आ. बाळाहेब पाटील यांचे पारंपारीक विरोधक पहिल्यांना एकत्र आले आहेत. प्रस्थापितांविरोधात दंड थोपटणारांमध्ये धैर्यशील कदक,मनोज घोरपडे,विठ्ठतात्या जाधव आणि लालासाहेब यादव हे चार नेते सह्याद्रीचे कार्यक्षेत्रात प्रचारसभांच्या माध्यमातून भूमिका मांडत आहेत. पी.डी.पाटील पॅनेलला आमदार बाळासाहेब पाटील यांचा चेहरा आहे तर यशवंतराव चव्हाण पॅनेलला ...