पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कराड नगरपालिका राजकारणातील नशीबवान विद्यमान उपनगराध्यक्ष जयवंत पाटील (दादा)

इमेज
कराड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या वेगळ्या कामकाज पद्धतीने कराडकरांच्या मनामध्ये अधिराज्य निर्माण केले आहे. कराड नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जयवंत पाटील यांना अनेक प्रकारच्या संधी मिळालेल्या आहेत. या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न जयवंत पाटील यांनी केलेला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग असो अथवा वॉर्ड यामधून निवडून येण्याची किमया सातत्याने जयवंत पाटील यांनी करून दाखवलेली आहे. कराड नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष म्हणून जयवंत पाटील कार्यरत आहेत.नगरपालिका राजकारणातील नशीबवान जयवंत पाटील (दादा) म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सहज अनेक पदे जयवंत पाटील यांच्याकडे चालून आलेली आहेत. कराड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत असतात. मात्र जयवंत पाटील हे नशीबवान आहेत. गतकाळामध्ये जयवंत पाटील यांच्याकडे चालून नगराध्यक्षपद आले आणि या पदावर असताना जयवंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. कराड एसटी स्टँडला लागून असणारा खोकीधारकांचा प्रश्न आणि कराडचा मुख्य बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचा ...

निरोगी जीवन जगण्याचा नवीन मूलमंत्र

इमेज
समाजामध्ये दोन वर्ग सुरुवातीपासून एकसारखेच आहेत. एक श्रीमंत आणि दुसरा गरीब. श्रीमंतांना भरपेट दोन वेळचे खाण्यास मिळते तर गरिबांना एक वेळचे खाणे मुश्कील आहे. श्रीमंतीत वाढलेले लोकाना खाण्यापिण्याची भ्रांत नसते, दरम्यान गरिबीमध्ये जीवन कंठणार्‍याना एक वेळचे अन्न मिळवण्यासाठी यातायात करावी लागत आहे. श्रीमंतीत वाढणारे खाऊन, खाऊन गलेलठ्ठ होतात, तर गरीब बिचारे खायला नसल्यामुळे सडपातळ असतात.समाजामध्ये गरीब - श्रीमंतांमध्ये असणारी दरी काही केल्या कमी होत नाही. वास्तविक देशातील गरिबी हटावचा नारा यापूर्वी दिला गेला मात्र, काही केल्या गरीबी हटली नाही. गरीब बिचारे प्रारब्धाचे भोग म्हणून कष्टमय जीवन जगत आहेत. परमेश्वराच्या कृपेने आपला जीवनक्रम श्रीमंत व्यथित करणारे ऐशोराम जीवन जगत आहेत. ढेरपोटे व अस्ताव्यस्त शरीराने गब्बर असणारे शरीराने बारीक होण्यासाठी उपाशी राहतात दरम्यान उपाशी राहणे योग्य नाही. आहारशास्त्रानुसार शरीरामध्ये आवश्यक घटक जाणे आवश्यकच आहे. आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटकांची कमी होणार नाही याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.अलीकडच्या काळामध्ये डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या सल्ल्यानुस...