"सह्याद्री"च्या गुलालानंतर "कृष्णा"ची रणधुमाळी सुरू
सामना - 25/3/2015 (गोरख तावरे) कराड उत्तरमधील "सह्याद्री"सहकारी साखर कारखान्याची सत्ता आमदार बाळासाहेब पाटील यांच्याच हाती कायम ठेवण्याचा निर्णय शेतकरी सभासदानी घेतला आहे."सह्याद्री"चा गुलाल हे बेरजेच्या राजकारणाचा व यशवंतराव चव्हाण व पी.डी.पाटील यांच्यासह आमदार बाळासाहेब पाटील नेतृत्वावरील विश्वास आहे.दरम्यान दक्षिणमधील "कृष्णा"साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली आहे.गटा-तटात व सग्यासोय-यातील आता धुमचक्री सुरू होणार आहे.सत्ताधारी अविनाश मोहिते असून मदनदादा माहिते,डाॅ.इंद्रजीत मोहिते आणि डाॅ.अतुल भोसले,माजी आमदार विलासकाका पाटील अशा तीन पॅनेलमध्ये सत्ता संघर्ष होण्याची शक्यता आहे. "सह्याद्री" शांत झाला असून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा बिगुल वाजला आहे. तिरंगी लढत निश्चित मानली जात आहे. यासाठी कराड, वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस या तालुक्यांतील कार्यक्षेत्रातील राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहेत.भौगोलीक परिस्थिती विभिन्न् असली तरी शेतकरी सभासदांच्या हितासाठी आमदार व ताकदवान राजकीय नेते "कृष्णा"च्या आखाड्यात उतरत अ...