पोस्ट्स

मे, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कराड दक्षिणमध्ये "विकास" वेडा झाला पृथ्वीराजबाबा आणि अतुलबाबा यांचा निधीसाठी सकारात्मक प्रयत्न

इमेज
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात नेहमीच राजकीय संघर्ष पाहावयास मिळतो. स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांच्याकडील आमदारकी विलासकाका पाटील त्यांनी खेचून घेतली. तर पस्तीस वर्ष आमदार असणारे विलासकाका पाटील यांच्याकडील आमदारकी पृथ्वीराज चव्हाण यांनी सहज मिळवली. आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असणारी आमदारकी डॉ. अतुल भोसले यांना हवी आहे ! आमदारकी  मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान कराड दक्षिण मतदारसंघासाठी विकास निधी मिळवण्यासाठी सर्वच राजकीय व्यक्ती  प्रामाणिक प्रयत्न करताहेत. कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी 1 कोटी 79 लाखांचा निधी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी आणला आहे तर कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबांच्या माध्यमातून १ कोटी 2० लाखाचा विकास निधी मंजूर झाला आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी अनेक जणांचा हात लागतो आहे. हे निदर्शनास येत आहे. प्रत्येक जण आपापल्या माध्यमातून विकास निधी घेऊन येत आहेत. दरम्यान येथे श्रेयवादाचा कुठलाही मुद्दा उपस्थित होत नाही हे विशेष आहे. विशेष म्हणजे पृथ्वीराजबाबा व अतुलबाबांनी जो निधी मिळवला तो ग्रामविका...

काँग्रेस असो की भाजप इंधन दरवाढ होतच आहे. सर्वसामान्य नागरिकांना महागाईशी मुकाबला करावाच लागतो

इमेज
पेट्रोल डिझेल हे इंधन सर्वानाच आवश्यक बाब आहे. सदरचे इंधन माफक व रास्त दरामध्ये सर्वांना मिळाले पाहिजे, ही सर्वसामान्यांची रास्त भूमिका व अपेक्षा आहे. दरम्यान विविध कारणास्तव सदरची दरवाढ करावी लागते, ही सरकारची भूमिका सर्वसामान्यांना पटत नाही, रुचत नाही. भाजप सरकारने या इंधनाचा दर रास्त प्रमाणात ठेवला, तर आगामी काळामध्ये भाजपला याचा फायदा होऊ शकतो. अन्यथा राजकीय तोटा सहन करावा लागेल. कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार अस्तित्वात आले तरीही सर्वसामान्यांना महागाईशी मुकाबला करावाच लागतो. आपले जीवन सुखकारक व्हावे, यासाठी देशातील सर्वसामान्य नागरिक अनेक वेळा विविध राजकीय पक्षांना सत्ता देऊन जीवन सुखकारक होईल, अशी अपेक्षा करतात, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडते आहे. हे इंधन दरवाढीवरून स्पष्ट होत आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीसंबंधाने सध्या देशभरामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. दररोज डिझेल - पेट्रोलशी सर्वसामान्यांपासून सर्वांचाच संबंध येत आहे. डिझेल व पेट्रोलच्या अनुशंगाने देशभरामध्ये सर्वत्रच राजकारण चालते, दरवाढ झाले की विद्यमान सरकारचे नावाने विरोधक शिमगा करीत असतात. यात बरेच काही स...

शिक्षणाचे चांगभलं. ... हस्तक्षप थांबवा. . .अपघाती मृत्यू

शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाले आहे. हे आता थांबवता येणार नाही, कारण शिक्षणाचे खासगीकरण केल्यानंतर त्याचा बाजारच होणार. शिक्षणामुळे समाज सुसंस्कारित होतो, अनेक पिढ्या सुसंस्कारित होतात, हा खरा शिक्षणाचा मूळ हेतू आहे. पण सध्या हा हेतू लांब राहिला आहे. वारेमाप पैसा मिळवण्यासाठी अनेकांनी शिक्षण संस्थांचा बाजार मांडला आहे. शिक्षण क्षेत्राच्या बाजारीकरणामुळे आजच्या युवकांना चांगले शिक्षण मिळत नाही. ही खंतही अनेक वेळेला शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करताहेत. नर्सरीपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत खाजगीकरण झाले आहे. नाक्यानाक्यावर व चौकाचौकात जशा पानपट्ट्या थाटल्या जातात, त्यापद्धतीने शिक्षण संस्थांनी आपला बाजार मांडला आहे. खाजगी शिक्षण संस्था अनेक शिक्षकांना नियमानुसार मानधन व पगार देत नाहीत अशा हजारो तक्रारी राज्यभरामध्ये आहेत. कर्जवसुली केल्याप्रमाणे शिक्षण संस्था विद्यार्थ्यांकडून फी वसुली करीत असतात. यामुळे शिक्षणाचा मूळ हेतूच व आत्मा हरवला आहे. दरम्यान लहान मुलांच्या स्कूल बसबाबत तर भीषण परिस्थिती आहे. खुराडात कोंबड्या भारतात अथवा गाडीत मेंढरं भरतात त्याप्रमाणे लहान मुलं स्कूल बसमध्ये कोंब...

मनोमिलन पारावरच्या वायफळ गप्पा, कराडला विधानपरिषदेची संधी शक्य नाही !

इमेज
विलासकाका पाटील यांना विधानपरिषद मिळाली तर मला आनंदच होईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले असले तरी संधी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गत विधानसभा निवडणुकीमध्ये त्यावेळी विलासकाका पाटील कराड दक्षिणचे आमदार होते. पृथ्वीराज चव्हाण राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी कराड दक्षिण मतदार संघ विलासकाका पाटील यांनी सोडावा आणि त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल अशी ऑफर देण्यात आली होती, अशी चर्चा चांगलीच रंगली होती. दरम्यान ही ऑफर विलासकाका पाटील यांनी स्वीकारली नाही आणि बंडखोरी करून काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. हा गतकाळातील इतिहास अद्याप सर्वांचे ध्यानीमनी आहे. पुन्हा हाच विषय चर्चेला येण्यामाचा हेतू काय ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येणारी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे विलासकाका पाटील यांनी जाहीर केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका पाटील यांच्या गटामध्ये मनोमिलन होणार ही चर्चा बरेच दिवस कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू आह...

कराड दक्षिणमध्ये आमदारकी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवा नेते अतुल भोसले, उदयसिंह पाटील निवडणूक मैदानात असणार ! (दैनिक सामना दि.८ मे २०१८, कराड वार्तापत्र - गोरख तावरे)

इमेज
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये राजकीय हलचल सुरू झाली आहे. काँग्रेस अंतर्गत गटबाजीला पूर्णविराम देण्याचा निर्णय होईल ! असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. तब्बल पस्तीस वर्ष कराड दक्षिण विधानसभा मतदार संघावर वर्चस्व गाजवणारे माजी मंत्री विलासकाका पाटील यांनी "येणारी विधानसभा निवडणूक मी लढविणार नाही,’ असे जाहीर केले आहे. गतकाळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विलासकाका पाटील यांचा पराभव झाला, अन्यथा त्यांच्या आमदारकीची सप्तपदी साजरी केली गेली असती. ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील यांचे नेतृत्व म्हणजे संघर्षातून तावून सुलाखून निघालेले व्यक्तिमत्त्व आहे. सामान्य जनतेशी आपुलकीची नाळ जोडणारे नेते म्हणून विलासकाकांची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील राजकारणातील भीष्माचार्य असे एकाकी राजकारणापासून बाहेर जात आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाने अनेक वर्षे दोनच आमदार पाहिले, ते म्हणजे यशवंतराव मोहिते व विलासकाका पाटील. सध्या काँग्रेसचेच पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. विलासकाका पाटील यांनी एका बाजूला आपली भूम...

व्यवसायामध्ये विश्वासहर्ता निर्माण करणारे, समाजहित रक्षक, विकास कामांना सकारात्मक वैचारिक पाठिंबा देणारे नगरसेवक विजय वाटेगावकर

इमेज
यशस्वी बांधकाम व्यावसायिक ते समाजहित रक्षक नगरसेवक अशी प्रतिमा निर्माण झालेले, बांधकाम व्यवसायामध्ये विश्वासहर्ता निर्माण करून समाजाचे आपण काही देणे लागतो ! यासाठी नगरसेवक पदाचा वापर समाजहितासाठी व कराडच्या विकासासाठी प्रयत्न करणारे आरोग्य समितीचे माजी सभापती व विद्यमान नगरसेवक विजय वाटेगावकर यांचा आज वाढदिवस असल्यामुळे ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे यांनी त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. . . विजय वाटेगावकर हे सामान्य कुटुंबातील असून त्यांनी उच्च शिक्षण घेतल्यामुळे बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. जे काम हाती घ्यायचे ते नीटनेटके व दर्जेदार करायचे असा त्यांचा कयास असतो. कराड शहरासह विद्यानगर, सैदापूर, मलकापूर शहरांमध्ये विजय वाटेगावकर यांनी अनेक व्यावसायिक इमारती उभ्या केल्या आहेत. गृह प्रकल्पांबरोबरच व्यावसायिक सदनिकाही त्यांनी तयार केलेल्या आहेत. दर्जेदार व भक्कम बांधकामांमुळे विजय वाटेगावकर यांनी उभ्या केलेल्या प्रकल्पांना तात्काळ मागणी होत असते. बांधकाम व्यवसायामध्ये विजय वाटेगावकर यांचे अनेक पार्टनर (साथीदार) आहेत. जे एकत्रित मिळून बांधकाम व्यवसाय करतात. पार्टनरशिपमध्ये पारदर्शक ...

पलूस विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार नाही ! काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कराडात घोषणा

इमेज
कराड (लक्ष्मीपुत्र) - सांगली जिल्ह्यातील पलूस विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराडात पत्रकारांशी बोलताना सांगितले. आदरणीय स्वर्गीय पी.डी. पाटीलसाहेब यांच्या मंगळवार पेठेतील निवासस्थानी आदरांजली अर्पण केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराडच्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, दिलीपतात्या पाटील, सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनिल माने, पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मोहन प्रकाश व राष्ट्रवादी पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली व आमच्या पक्षाचे व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आलेले आहेत. लोकसभेच्या दोन जागा गोंदिया राष्ट्रवादी पार्टी व पालघर काँग्रेस पक्ष लढवेल. विधानसभेची पलूसची जागा ज्येष्ठ नेते डॉ पतंगराव कदम यांचे निधन झाल्यामुळे या पलूस जाग...

"तुमची मायेची शाल माझ्या खांद्यावर टाका" डॉ. विश्वजित कदम यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भावनिक आवाहन !

इमेज
कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उशिरा व्यासपीठावर दाखल झाले. तत्पूर्वी कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. पुरस्कारप्राप्त काही पत्रकारांचा सत्कारही संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे व भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील दैनिक पुढारीचे चिप ब्युरो हरिष पाटणे यांचा सत्कार झाला होता. हरिष पाटणे मनोगत व्यक्त करताना जयंत पाटीलसाेब यांना चिमटा काढत म्हणाले,"साहेब तुमची मायेची शाल आमचे अंगावर राहून गेली" असे सांगितले. हाच धागा पकडत भारती विद्यापीठाचे कार्यवाह विश्वजित कदम यांनी जयंत पाटील यांना साकडे घालून "आपली मायेची शाल माझा खांद्यावर टाकावी" असे भावनिक आवाहन केले. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगलीतील पलूस विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून तेथे डॉ. विश्‍वजित कदम अर्ज भरणार आहेत. या पलूस जागेच्या वाटपासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सध्या चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे पुरस्कार वितरण पुण्यात झाले. या कार्यक्रमाला मी आवर्जुन उपस्थित होत...