पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मित्रांच्या घोळक्यातील परममित्र विलास जाधवचे अभिष्टचिंतन. . . . ! ( 9823335544)

इमेज
आमचा बालपणापासूनचा परममित्र विलास बजरंग जाधव याचा आज वाढदिवस. यानिमित्ताने परममित्र विलास जाधव यांच्या स्वभाववैशिष्ट संबंधाने थोडेसे चार शब्द . . . .गोरख तावरे विलास जाधव, सुभाष होगाडे,दादा उर्फ एकनाथ तावरे यानी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण या तिघांचे एकत्रित झाले आहे. त्रिमूर्ती म्हणून तीन मित्रांचा गौरव केला जातो. मित्र असावेत तर असे, हे अभिमानाने सांगितले जाते. एकमेकांच्या सुखदु:खाला हे मित्र एकत्रित असतात. विलास बजरंग जाधव याला कौटुंबिक सुसंस्कृत पार्श्वभूमी आहे. जाधव कुटुंबीयांना राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा आहे. माजी नगराध्यक्ष स्वर्गीय जयवंतराव जाधव व युवानेते अरुण जाधव यांचा विलास हा चुलत भाऊ आहे. विलास जाधव याला वाचनाची प्रचंड आवड आहे. दररोज किमान पाच ते सात दैनिकांचे वाचन तो करीत असतो. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी आपल्या घरातील उमेदवाराच्या प्रचारात विलास जाधव सक्रिय सहभाग घेत असतो. उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभागामध्ये प्रत्येक मतदारांच्या गाठीभेटी घेऊन, आपल्या कुटुंबाचा व उमेदवारांबाबत सकारात्मक प्रचार करीत असतो. नगरपालिका निवडणुकापुरताच राजकारणात विला...

३२४ मराठी वृत्तपत्रांचा मृत्युलेख!

इमेज
रोखठोक : संजय राऊत ( दैनिक सामना ) वृत्तपत्र स्वातंत्र्य ही कुणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही, पण राज्यकर्त्यांना स्वातंत्र्याची मालकी स्वतःकडे हवी आहे. ३२४ मराठी वृत्तपत्रांना सरकारी जाहिरातींच्या यादीवरून सरकारने काढून टाकले आहे आणि इतर ७०० जिल्हा वृत्तपत्रांवर ही कुऱ्हाड चालविण्याची तयारी सुरू आहे. पाच-दहा भांडवलदार वृत्तपत्रांना‘बळ’ देण्यासाठीच हे चालले आहे. ३२४ जिल्हा वृत्तपत्रांचा हा मृत्युलेखच आहे! प्रिय वाचकहो, आतापर्यंत अनेकांवर मृत्युलेख लिहिण्याचे वृत्तपत्रीय कर्तव्य मी बजावले. पत्रकारितेचा धर्म म्हणून हे काम मी केले. अनेकांना श्रद्धांजली वाहिल्या. अनेकांच्या अंत्ययात्रेतही सामील झालो, पण मृत्युलेख लिहिणे हे सर्वात कठीण. संपादकाचा खरा कस मृत्युलेखावर लागतो. हे मृत्युलेख माणसांवरचे होते, परंतु मी आज किमान ७०० मराठी वृत्तपत्रांवर मृत्युलेख लिहीत आहे. वृत्तपत्रांवर मृत्युलेख लिहिणे म्हणजे स्वतःचाच मृत्युलेख लिहिण्यासारखे आहे. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आपली वैयक्तिक मालमत्ता समजून ७०० वृत्तपत्रांचा गळा घोटण्याचे काम केले आहे. त्या सर्व वृत्...

आक्रमक, बिनधास्त, रयतेचा राजा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

इमेज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर महाराष्ट्रातील मराठी माणूस निस्सीम प्रेम करतो. त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर मराठी माणूस प्रेम करतो, आणि जिव्हाळा आस्था मराठी माणूस बाळगतो. महाराष्ट्रातील बहुतांश युवावर्ग श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आकर्षित झालेले आहेत. आपल्या बिनधास्त व समाजकार्यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले देशभर प्रसिद्ध आहेत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस यानिमित्ताने घेतलेला आढावा. सातारा लोकसभा मतदार संघातील लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दैनिक लक्ष्मीपुत्र परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा. . . . . संपादक सुलतान फकिर मी काल पण तुमचा होतो, आज ही तुमचाच आहे,आणि भविष्यात बदल होणार नाही. असा विश्वास छत्रपती उदयनराजे भोसले रयतेला देत असतात. यामुळे महाराष्ट्राची जनता त्यांच्यावर निस्सीम व जिवापाड प्रेम करीत आहे. सामान्य रयतेच्या मनातील खदखद व विचार उदयनराजे...

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ऐक्य वाढवावे - आमदार बाळासाहेब पाटील

इमेज
कराड - आपआपसांतील मतभेद विसरून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ऐक्य वाढवावे, असे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी मरळी (ता.कराड) येथील विविध विकास कामांच्या भूमिपुजन आणि उद्घाटन प्रसंगी केले. मरळी (चोरे) ता.कराड येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने डोंगरी विकास निधीमधून अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन आणि जोतिबा मंदिरासमोरील सभामंडपाचे उद्घाटन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कराड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य देवराजदादा पाटील, जि.प.सदस्या सुरेखा जाधव, पचायत समितीचे माजी सदस्य सोमनाथ जाधव, मानसिंगराव मोहिते, संजय कदम, जयवंतराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, सध्या केन्द्र व राज्य सरकार सवंग लोकप्रियतेसाठी अनेक फसव्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करीत असून साध्या साध्या गोष्टींसाठी जनतेस वेठीस धरले जात आहे. विकास हि सातत्याने चालणारी प्रकि‘या असून त्यासाठी गावांने आपआपसामधील मतभेद बाजूला ठेवून एकसंघ राहणे आवश्यक आहे, या गावाने नेहमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब, पी.डी....

विकृत व आंधळे भक्त

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्रातील एक जाणता राजा शरदचंद्र पवार यांची महामुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच घेतली. या महामुलाखतीबाबत मुलाखत होण्यापूर्वी मुलाखत झाल्यानंतर बरीच चर्चा सुरू आहे. शरद पवार अन् राज ठाकरे हे वेगवेगळया पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक नेत्याचा समर्थक आपल्या नेत्याने कशी समर्पक उत्तरे दिली. याबाबत बोलत आहेत तर, आमच्या नेत्याने कसे खोचक प्रश्न विचारले याबाबत खुशमस्करी केली जात आहे. दरम्यान सध्या राज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपभक्त व मोदीभक्त या मुलाखतींबाबत टिंगलटवाळी करीत आहेत. भक्तांची भाषा व भक्तांची अक्कल पाजळने पाहिल्यानंतर त्यांना जोड्याने मारावे अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना निर्माण होत आहे. आदरणीय शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान दिले आहे. याचा विसर या आंधळय़ा भक्तांना पडलेला दिसतो. वास्तविक पाहता आपल्यापेक्षा मोठे व जेष्ठांचा सन्मान करावा, ही आपली संस्कृती आहे. मात्र अलीकडच्या काळातील भक्तांचे आंधळे प्रेम वाढले आहे. इतरांचा सन्मान करावा, अशी त्यांची भावनाच राहिलेली न...

विद्यार्थ्यानी स्वत:चे व्यवसायाचे स्वप्न ठेऊन वाटचाल करावी - दिलीप गुरव

इमेज
कराड   -  मराठी तरुण विद्यार्थ्यानी स्वताचा व्यवसाय करायचे स्वप्न ठेऊन पुढील वाटचाल करावी. सरकारी नोकरी मिळेलच याची आताच्या युगात शाश्वती देता येत नाही. गुलामगिरी पत्करण्यापेक्षा स्वतंत्र विचार करुन उद्योग धंदा उभारण्याच्या द्रुष्टीने प्रयत्न करावा. 10 वी च्या विद्यार्थांनी या द्रुष्टीने प्रयत्न करावेत आणि  अशाच अभ्यास क्रमाची निवड करावी यासाठी तुम्हाला लागेल ति मदत कराड अर्बन बँक करेल.  सदैव आपल्या पाठीशी राहील व  मदत करेल असे मत कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी व्यक्त केले.  सागवी ( पुणे) छ. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै .सौ .शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक शाळा , शिशूविहर , नूतन माध्यमिक विद्यालय , मोडर्न नर्सरी , सुंदरबाई भानसिंग हुजा इंग्लिश मीडियम स्कूल सांगावीच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव बोलत होते. विठ्ठलराव ढवळे यांनी शाळेला 51 हजार रुपयाची देणगी दिली .यावेळी शाळेत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितर...

कराडमधील २३ रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

इमेज
कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड नगरपरिषद हददीतील विविध रस्त्यांची कामे हाती घेणेकामी राज्य शासनाकडुन उपलब्ध झालेल्या रक्कम रु.२.०० कोटी अनुदानामधुन हाती घ्यावयाच्या  कामांचा भूमीपुजन शुभारंभ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे हस्ते व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली तसेच जेष्ठे नगरसेवक विनायक पावसकर  यांचे उपस्थितीत संपन्न झाला. सदरील अनुदान प्राप्त करणेकामी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी विशेष प्रयत्न केला होता. त्यांचे प्रयत्नातुन सदरील निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करुन दिलेला आहे. या अनुदानामधुन शहराचे विविध भागातील म्हणजे सोमवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, शिवाजी हौसिंग सोसायटी तसेच वाढीव भागातील एकूण २३ रस्त्यांची कामे होणार आहेत.सदरील कामे शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेणेत आलेली आहेत. प्रतिनिधीक स्वरुपात सर्व रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ शिवाजी हौसिंग सोसायटी येथील राम मंदिर येथे संपन्न झाला. सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती हणमंतराव पवार, पाणी पुरवठा समिती सभापती अरुण...

एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज

इमेज
( गोरख तावरे ) छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य व स्फूर्तीदायक इतिहास सर्वांसमोर आहे. जगभरामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा पोवाडा सर्वत्र आनंदाने गायला जात आहे. बलाढ्य व शक्तिशाली मुस्लिम राजवटीच्या विरोधात, शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने केलेली लढाईमुळे, ऐतिहासिक इतिहास निर्माण केला आहे. जगभरामध्ये अनेक लढाई व ऐतिहासिक घटना घडल्या मात्र, शिवाजी महाराजासारखा इतिहास कोणत्याही देशामध्ये घडलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अल्प व विश्वासू, प्रामाणिक मावळ्यांच्या भरोश्यावर स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य निर्मितीची प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रामाणिक मावळ्यांच्या भरोशावर शिवाजी महाराजांनी घडवलेला इतिहास अजरामर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये सर्व जाती, धर्माचे लोक सहभागी झाले होते. इतकेच काय पण, मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात स्वराज्य निर्मितीसाठी तत्कालीन परिस्थितीत सहभागी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष जगात निर्माण झाला नाही. शिवाजी महाराजांचा एक एक किस्सा सांगायचे झाले तर मोठमोठे प्रबंध लिहिले जातील. अनेक इतिहासकारांनी शिवाजी महाराजांनी क...

संतपरंपरेमुळेच मराठी भाषा समृद्ध - डॉ. सदानंद मोरे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या स्मृती जागृत - डॉ. सुरेश भोसले

इमेज
कराड, ( लक्ष्मीपुत्र ) - संतपरंपरेमुळेच मराठी भाषा समृद्ध झाली असून, सर्वदूर पसरली आहे. संत हे आपले भाषिक पूर्वज असून, त्यांच्याशी आपले असणारे नाते हे भाषिक व सांस्कृतिक अंगाने जडलेले आहे, असे प्रतिपादन संतसाहित्याचे थोर अभ्यासक, अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व तुकाराम महाराजाचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी केले. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.   व्यासपीठावर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, श्री मारूतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती ह.भ.प. बाजीरावमामा कराडकर, वडगावच्या जयरामस्वामी मठाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठलस्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘संत आणि आपण’ या विषयावर विवेचन करताना डॉ. मोरे म्हणाले, की मराठी भाषेला संतांनी घडविले आहे. जे स्वत:ला मराठी भाषिक समजतात त्यांचे संतांशी नाते आपोआप जुळले जाते. संतांचा व आपला पारमार्थिक व आध्यात्...

दीप पुरस्काराने रशिद शेख सन्मानित उत्तम संस्काराशिवाय खेळाडूला यशाकडे जाता येत नाही - सुरेश महाजनी

इमेज
कराड दि.१६ (सावा) - खेळावर निष्ठा,मेहनतीची तयारी व उत्तम संस्काराशिवाय कोणत्याही खेळाडूला अपेक्षित यशाकडे जाता येत नाही.असे प्रतिपादन ज्येष्ठ क्रीडासंघटक सुरेश महाजनी यांनी केले.  कराड जिमखाना आयोजित स्व. दीपक शहा स्मृति सदभाव मेळाव्यात श्री महाजनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शाह,जन.सेक्रेटरी सुधीर एकांडे, उपाध्यक्ष अनिल शहा,दीपक वाटेगावकर व दीप पुरस्काराचे मानकरी क्रीडा संघटक रशिद शेख मंचावर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले आज सर्वच खेळात मोठ्या प्रमाणात खेळाडूंना पैसे मिळत आहेत. ही जशी चांगली गोष्ट आहे तसेच ही चिंतेचीसुद्धा बाब आहे. माञ उत्तम संस्कार व खेळावर निष्ठा ठेवुन मनोभावे मेहनत घेतली तर खेळातही उत्तम करिअर होऊ शकते. कराडसारख्या ठिकाणी रशिद शेख सारखी मंडळी तन, मन, धन अर्पून नवोदितांसाठी झटत असल्याचे बघुन अभिमान वाटला. गेली पस्तिस वर्ष रशिद खेळाचे कोणतेही तांञिक शिक्षण नसताना तसेच, आर्थिक परिस्थित नसताना जिद्दीने तरुण खेळाडू घडविण्याचे कार्य करतोय ते केवळ संघटन कौशल्य व प्रामाणिकपणावरच अशा संघटकांच्या पाठीशी समाजाने ...

सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी हर्षद कदम यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद

इमेज
कराड  - शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख भानुप्रताप ऊर्फ हर्षद कदम यांनी आज वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करावा असा आशीर्वाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हर्षद कदम यांना दिला. मुंबई येथील शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी केला. सातारा जिल्ह्यात शिवसेनेची सुरु असलेली घौडदोड व शिवसेना करीत असलेला कामांचा कार्यअहवाल शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केला. कराड येथील शिवसेनेची सभा यशस्वी करण्यासाठी व नियोजनबद्ध पद्धतीने आखणी केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हर्षद कदम यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिवसेना पोचवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. गतकाळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आणि शिवसेनेचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचावा यासाठी विविध कार्यक्र...

सातारा जिल्ह्यात शिवसेनेला प्रभावी करणारे - हर्षद कदम

इमेज
सातारा जिल्ह्यातिल पाटण तालुक्यातील मल्हारपेठ गावचे उदयोन्मुख तरूणांचे आयडॅाल तडफदार नेतृत्व शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख मा.भानुप्रताप उर्फ हर्षद मोहनराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा---------    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्या विचारावर निस्सिम प्रेम करणारे शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी सातारा जिल्ह्यात शिवसेनेची चांगल्या प्रकारे बांधणी केली आहे. नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कराडात सभा झाली, सभा यशस्वी व नियोजनबद्ध पद्धतीने हर्षद कदम यांनी पार पाडली आहे. बऱ्याच वर्षानंतर कराडमधील भाजीमंडई परिसरात, जनता व्यासपीठाशेजारी शिवसेनेची न भूतो न भविष्यती अशी सभा पार पडली. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख म्हणून हर्षद कदम यांच्या गळ्यांमध्ये घातलेली माळ यशस्वी झाले असे म्हणता येईल. ठाणे जिल्ह्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे शिवसेनेचे  नेते धर्मविर कै.आनंद दिघे साहेबांच्या सानिध्यात वाढलेले कदम कुटुंबिय गेली ४० वर्ष...

न्युज पेपर्स असोशिएशनच्या राज्य कार्यकारीणीची बैठक पुणे येथे संपन्न 17 मे 2018 ला संघटनेचे राज्य अधिवेशन पंढरपूर येथे

इमेज
पुणे - असोसिएशन ऑफ स्माॅल मिडीयम न्युज पेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या राज्य कार्यकारीणीची बैठक राज्य अध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय सचिव अजित म्हाञे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरीचिंचवड महानगर पालीका भवनातील पञकार कक्ष येथे संपन्न झाली.मान्यवरांचे स्वागत पुणे जिल्हा अध्यक्ष सतीशश्चंद्र जकाते,  जिल्हा कार्याध्यक्ष प्रा यशवंत गायकवाड , शशीकांत डांगे,  यानी केले. बैठकीच्या प्रारंभी आचार्य बाळशास्ञी जांभेकर व कै. भा.वी.कांबळे  (पञकार ) यांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर पुणे येथील जेष्ठ पञकार कै.विनोद कूलकर्णी याना दोन मिनीटे स्तब्ध ऊभे राहुन श्रद्धांजली वाहण्यात आली.   मागील सभेचे प्रोसोडींगचे वाचन राज्य महासचिव प्रदीप कुलकर्णी यानी केले. ईम्पाल येथे दि 14 जानेवारी रोजी संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक झाली. या बैठकीतील निर्णयाची माहिती राष्ट्रीय सचिव अजित म्हाञे यानी दिली.दि.8 ऑगस्ट 2017 व 16 नोव्हेंबर 2017 रोजी संघटनेच्या वतीने राबविलेल्या निवेदन अभियानाची माहिती स...

वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल माफ करा - डॉ. अतुल भोसले

इमेज
कराड,दि.१२ (सावा) -  वाकुर्डे योजनेचे वीज बिल थकीत असल्याने सध्या ही योजना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या योजनेचे लाभार्थी असणार्‍या गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणूनच वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल माफ करून ही योजना पुन्हा कार्यान्वित करावी, अशा मागणीचे निवेदन डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.  इस्लामपूर येथे आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला जाण्यासाठी आज सकाळी सव्वा दहा वाजता मुंबईहून कराड विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. याठिकाणी भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कराड दक्षिणमध्ये शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमधील ग्रामस्थांच्यावतीने वाकुर्डे योजनेबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. कराड दक्षिण मतदारसंघातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हार...

आयुष्य सुन्दर

स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं! विश्वास उडाला की आशा संपते! काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते! म्हणुन, स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या! आयुष्य खूप सुन्दर आहे... प्रत्येकाचे आयुष्य फार सुंदर, सुखकारक, मनोरंजक आहे. ते विश्वासाने जगले पाहिजे. दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येकाने कोणते ना, कोणते स्वप्न पाहणे गरजेचेच आहे. स्वप्न परिपूर्तीसाठी सकारात्मक प्रयत्न केला पाहिजे. स्वप्न संपलं की आयुष्य थांबतं, असं म्हटले जाते. आपल्या स्वप्नरंजनात जगणं हा एक वेगळाच आनंद आहे. आयुष्यात असेच पुढे आनंदाने जायचे असेल तर स्वप्नही पहावीच लागतील. जगण्यावर विश्वास पाहिजे, विश्वास असेल तर जगणे आनंदकारक होईल. आणि जगण्यावरचा विश्वास संपला की आशा संपते. स्वप्न, विश्वास, अाशा यामुळेच जीवन परिपूर्ण होऊ शकते. स्वतःची काळजी स्वतःच घेतली गेली पाहिजे. स्वतःवर मनसोक्त प्रेम करायला शिकले पाहिजे. स्वतःवर प्रेम करताना दुसऱयाचा दुस्वास करणे सोडले पाहिजे. म्हणूनच मनसोक्त स्वप्न पाहा, कोणती तरी आशा ठेवा, आणि विश्वासाने जगा, जीवनात परिपूर्ण प्रेम मिळेल. म्हणूनच म्हटले जाते, आयुष्य सुंदर आहे ते सकारात्मक पद्...

श्रीयात्रा एका अजातशत्रूची..सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील

इमेज
प्रशासकीय सेवेतून कामाला सुरुवात करणारे व माणसांच्या सहवासासाठी सतत तहानलेले व्यक्तिमत्व म्हणजे सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील. प्रचंड धडपड व जिद्दीच्या जोरावर शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. या प्रेरक व्यक्तिमत्वाच्या जीवनकार्याचा हा थोडक्यात मागोवा: उत्तम प्रशासक, उत्तम वक्ता, थोरामोठ्यांचा सहवास लाभलेले, साहित्य रसिक, कलावंत व लोककलावंतांबद्दल अस्था असणारे, सुसंस्कृत वारसा लाभलेले राजकारणी, समाजकारणी, अजातशत्रू अशा अनेक गुणवैशिष्ठ्यांनी भारून गेलेले व्यक्तिमत्व म्हणजे कराडचे श्रीनिवास पाटील! अंगभूत गुणवत्ता, कल्पकता व अविरत कष्टाची तयारी असेल तर एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती काय करू शकते, याचा ते आदर्श आहेत. कष्टाच्या व चिकाटीच्या बळावर त्यांनी प्रशासनातील वेगवेगळी पदे भूषवली. त्याचा वापर स्वतःच्या मिरासदारीपेक्षा गोरगरिबांचा विकास व्हावा, त्यांचा उत्कर्ष व्हावा यासाठी सदैव केला.     श्रीनिवास पाटील यांच्या पायाला जणू चक्र आहे. त्याबळावर त्यांनी त्या त्या भागातील सर्व थरांतील लोकांचा स्नेह मिळवला. त्याबळावरच त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे उभी ...

चांगला विचार

इमेज
समाजामध्ये विविध स्वभावाचे, मानसिकतेचे व विचाराचे लोक असतात. प्रत्येक जण स्वहित पाहिल्यानंतर समाजहिताचा विचार करीत असतात. आपण समाजासाठी काम करतो आणि समाजामध्ये आपली ओळख निर्माण व्हावी, आपल्या नावाचा गौरव व्हावा, यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न सुरू असतो. काही समाजसेवक निस्वार्थीपणे काम करतात तर काही वक्ते मानधन घेऊन समाज प्रबोधनाची चळवळ करीत असतात. दोघांचा हेतू एकच असतो की समाजामध्ये चांगुलपणा वाढावा. परंतु समाजामधील काही लोक मानधन घेऊन प्रबोधन करणारेबाबत टिका टिप्पणी करतात. काही प्रसंगी निस्वार्थीपणे काम करणारेही टीकेपासून सुटत नाहीत. “आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे.” समाजामध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी सुरू असलेला खटाटोप पाहिल्यानंतर, समाज आपणाकडे कोणत्या नजरेने पाहतो, याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. समाजामध्ये विकृती असणारे लोक हे चांगले काम करणाऱ्यावर टीका करतात मात्र, चांगले विचार जपणाऱ्या लोकांनी कौतुक केले पाहिजे. ही रास्त अपेक्षा बाळगणे गैर नाही. समाजामध्ये आपली ओळख सद्गुणी, चांगला, प्रामाणिक, हितचिंतक अशी निर्माण झाली पाहिज...

सद्गुण, सदभाव बाळगणारा, सकारात्मक पत्रकारिता करणारा मित्र देवदास मुळे

इमेज
दैनिक तरुण भारतचे पत्रकार देवदास मुळे, यांची गेल्या अठरा - वीस वर्षातील पत्रकारिता ही सकारात्मक पत्रकारिता आहे. कराड शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने, सकारात्मकदृष्ट्या लोकांना त्याचे अवलोकन व्हावे, यासाठी देवदास मुळे पत्रकारिता क्षेत्रांमध्ये आले आहेत. असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करणे, बातमी कशी असावी, बातमीचा सोर्स कसा निर्माण करावा, बातमीचा फायदा समाजाला कसा झाला पाहिजे, याबद्दल ते सविस्तर विवेचन करीत असतात. शांत, संयमी व ओघवत्या भाषाशैलीचे व्यक्तिमत्त्व म्हणून देवदास मुळे यांच्याकडे पाहिले जात आहे. पत्रकारितेच्या प्रारंभापासून देवदास मुळे, दैनिक तरुण भारतमध्ये काम करीत आहेत. हे त्यांचे वैशिष्टय़ म्हणता येईल. दैनदिन जीवनात, देवदास मुळे यांच्या अपेक्षा व स्वप्न फार मोठी नाहीत. जी स्वप्न आहेत, ती सत्यात उतरवण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. कराड तालुक्यातील सर्व पत्रकारांचा मार्गदर्शक, हितचिंतक म्हणून देवदास मुळे याच्याकडे पाहिले जात आहे. पत्रकारांसाठी कोणताही उपक्रम राबवायचा असेल, तर देवद...

सद्गुण, सदभाव बाळगणारा, सकारात्मक पत्रकारिता करणारा मित्र देवदास मुळे

इमेज
दैनिक तरुण भारतचे पत्रकार देवदास मुळे, यांची गेल्या अठरा - वीस वर्षातील पत्रकारिता ही सकारात्मक पत्रकारिता आहे. कराड शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने, सकारात्मकदृष्ट्या लोकांना त्याचे अवलोकन व्हावे, यासाठी देवदास मुळे पत्रकारिता क्षेत्रांमध्ये आले आहेत. असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करणे, बातमी कशी असावी, बातमीचा सोर्स कसा निर्माण करावा, बातमीचा फायदा समाजाला कसा झाला पाहिजे, याबद्दल ते सविस्तर विवेचन करीत असतात. शांत, संयमी व ओघवत्या भाषाशैलीचे व्यक्तिमत्त्व म्हणून देवदास मुळे यांच्याकडे पाहिले जात आहे. पत्रकारितेच्या प्रारंभापासून देवदास मुळे, दैनिक तरुण भारतमध्ये काम करीत आहेत. हे त्यांचे वैशिष्टय़ म्हणता येईल. दैनदिन जीवनात, देवदास मुळे यांच्या अपेक्षा व स्वप्न फार मोठी नाहीत. जी स्वप्न आहेत, ती सत्यात उतरवण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. कराड तालुक्यातील सर्व पत्रकारांचा मार्गदर्शक, हितचिंतक म्हणून देवदास मुळे याच्याकडे पाहिले जात आहे. पत्रकारांसाठी कोणताही उपक्रम राबवायचा असेल, तर देवद...

विरोधकांचा राजकीय अस्तित्वाचाच प्रश्न. . . ! लोकसभा निडवणुक लढवणार ही अफवा - डॉ. अतुल भोसले

इमेज
कराड ( लक्ष्मीपुत्र ) - आगामी लोकसभा निडवणुक डॉ. अतुल भोसले लढवणार नाहीत, तर कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात त्यांनी विकास कामे केली आहेत, त्यावर परिणाम व्हावा. म्हणून विरोधकांनी अफवा पसरवली आहे. असा खुलासा करण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध युवानेते डॉ अतुल भोसले यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा सामना रंगणार नाही, याला आता पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात विकासकामांचा धडाका लावलेला आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी मतदारसंघांमध्ये सक्षमपणे केली आहे. यामुळे कराड दक्षिण मतदार संघातील जनतेचा पक्षावरील विश्वास दृढ होत आहे. या विकासकामांचा दृश्यपरिणामांमुळे विरोधकांना पोटशूळ उठल्याने विरोधकांचा राजकीय अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे त्यांनी हेतुपुरस्सर आज लोकसभेच्या उमेदवाराविषयी काही चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित केल्या आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. असा खुलासा डॉ. अतुल...

उदयनराजे भोसलें विरोधात डॉ. अतुल भोसले लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवारांच्या विरोधात भाजपचा खमक्या उमेदवार असणार !

इमेज
कराड ( लक्ष्मीपुत्र ) - आगामी लोकसभा निवडणुकीत सातार्‍यात भोसले विरुद्ध भोसले असा राजकीय संघर्ष दिसू शकतो. आणि याचीच जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सलग दोनदा छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देऊन सातारचा गट हा राष्ट्रवादीचा आहे. असे सिद्ध केले आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीने सातारचा गड जिंकायचाच असा चंग बांधला आहे. यासाठी युवानेते डॉ. अतुल भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. सातार्‍याचे बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना कोण शह देऊ शकेल ? या प्रश्नावर भाजपमध्ये खलबत सुरू आहे. यावर सध्या तरी भाजपकडे एक जोरदार पर्याय आहे. आणि तो म्हणजे, कराडचे युवानेते आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले होय.सातारा लोकसभा मतदार संघामध्ये सक्षम उमेदवार म्हणून डॉ.अतुल भोसले निवडणूक लढवू शकतात.यापूर्वी डॉ.अतुल भोसले यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ व कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढून मताधिक्य घेतले आहे.पाटण, माण, खटाव, वाई, महाबळेश्वर, फलटण तालुक्यांमध्ये विद्यमान ख...

गावच्या विकासासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे - आमदार बाळासाहेब पाटील अंतवडी ता.कराड येथे अंगणवाडी इमारत बांधणे आदी कामांचे भुमीपूजन व उद्घाटन

इमेज
 कराड ( लक्ष्मीपुत्र ) -   गावच्या विकासासाठी आपआपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे व ऐक्य वाढवा, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी अंतवडी ता.कराड येथे केले. अंतवडी ता.कराड येथे आमदार बाळासाहेब पाटील यांचे विशेष प्रयत्नाने कोयना भुकंप विकास निधीमधून अंतवडी ते पुसेसावळी-कराड रस्त्यास जोडणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण करणे, जिल्हा नियोजन समिती निधीमधून अंगणवाडी इमारत बांधणे आदी कामांचे भुमीपूजन व उद्घाटन प्रसंगी आमदार बाळासाहेब पाटील बोलत होते. या प्रसंगी गावातील नवनिर्वाचित उपसरपंच सौ सुभद्रा (अक्काताई) शिंदे, व नवनिर्वाचित ग‘ामपंचायत सदस्य तसेच माजी सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर रिसवड-अंतवडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सदाशिव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. जि.प.सदस्य मानसिंगराव जगदाळे, कराड कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दाजी पवार, कारखान्याचे संचालक संजय जगदाळे, संजय थोरात, माणिकराव पाटील, भास्कर गोरे, डी.बी जाधव आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब बँकेचे संचालक सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार बाळासाहेब प...