पोस्ट्स

मे, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मृदू भाषीक - अविनाशदादा मोहिते

इमेज
"कृष्णा"निवडणूक भाग - 3 मृदू भाषीक - अविनाशदादा मोहिते (गोरख तावरे) कृष्णा सहकारी साखर कारखाना उभारणीत जेष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते व सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांचा सिंहाचा वाटा आहे.त्याचबरोबर या दोन्ही बंधूंच्या खांदयाला खांदा लावून तत्कालीन संस्थापक संचालकांचाही वाटा आहे.हा इतिहास आता कोणी विसरणार नाहीत कारण कृर्षीमहर्षी आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते यांनी गतकाळातील कृष्णा निवडणूकीत संस्थापक पॅनेल उभे करून कृष्णेत सत्तांतर घडवले आणि अख्या महाराष्ट्राने "हे अंचिबीत व विपरीत काय घडले"असा प्रश्न केला."कोण आहे हा अविनाश मोहिते" मोहिते-भोसले ताकदीला आव्हान देणारा म्हणून अविनाश मोहिते यांना पाहण्याची अनेकांना उत्सुकता लागली होती. शांत,संयमी,मृदू भाषीक असे अविनाशदादांचे व्यक्तीमत्व आहे.घराण्याला परंपरा असूनही कराड तालुक्याच्या राजकारणात आबासाहेब मोहिते घराण्याला काही महत्व नव्हते.कृष्णा कारखाना उभारणीत आबासाहेबांचाही पुढाकार होता मग आमचे मोहिते घराणे कराडच्या व कृष्णा कारखान्याच्या दैनंदिन कामकाजापासून लांब का ? असा प्रश्न अविनाशदादांन...

लढवय्या नेता - मदनरावदादा मोहिते

इमेज
कृष्णा निवडणूक भाग - 2 लढवय्या नेता - मदनरावदादा मोहिते (गोरख तावरे) कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक,जेष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी दूरदूष्टीकोण नजरेसमोर ठेवून कृष्णा कारखान्याची स्थापना केली.राज्याच्या मंत्रीमंडळात अभ्यासू मंत्री म्हणून भाऊंची ख्याती होती.सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करता येतो.तो ही आखीव - रेखीव हे आपल्या कृतीतून त्यांनी दाखवून दिले आहे.महाराष्ट्राचे जेष्ठ विचारवंत म्हणून यशवंतराव मोहिते (भाऊ)यांचा आदर केला जायचा.याचा रास्त अभिमान कराड तालुक्याला आहे.याच मुशीत व विचारात घडलेले मदनरावदादा मोहिते आहेत.भाऊंच्या विचार वाटेवरून तसूभरही मदनरावदादा कधीही विचलीत झाले नाहीत."कृष्णा"च्या पहिल्या सत्तांतरानंतर व भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मदनरावदादा पहिल्यांना "कृष्णा"चे अध्यक्ष झाले.याच काळात यशवंतरावभाऊ व जयवंतरावआप्पा या दोन सख्या भावांमधील वैचारीक संघर्ष अख्या महाराष्ट्राने पाहीला आहे. मदनरावदादा हे स्पष्ट व्यक्ते अशी त्यांची ओळख आहे.भाऊंनी आखून दिलेल्याच सहकारांतील तत्वाप्रमाणे काम करीत होते.ऊसउत्पादक शेतक-यांच्...

डाॅ.सुरेश भोसले आधुनिकतेचा नेता

इमेज
डाॅ.सुरेश भोसले आधुनिकतेचा नेता (गोरख तावरे) सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांनी सहकार क्षेत्रात जे सामान्य शेतकरी व शेतक-यांच्या मुलांसाठी केलेले काम अतुलनीय आहे.30 वर्षे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील शेतक-यांचे जीवनमान उंचवावे,आर्थिक सुबत्ता यावी यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले आहे.याचा विसर कार्यक्षेत्रातील सभासदांना पडता उपयोगाचा नाही.अनेक आरोपांचा सामना करीत जयवंतराव भोसले यांनी कल्पकतेने भागाचा विकास करताना सहकाराचा चांगला उपयोग केला आहे.राजकीय मतभेदापलीकडे विचार करून जयवंतरावआप्पांनी शेतीला पुरक अनेक संस्था उभ्या केल्या आहेत.हे सांगण्याचा हेतु काय ? तर सध्या कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीचा राजकीय धुरळा उडू लागला आहे. जयवंतरावआप्पांच्या पश्चात डाॅ.सुरेश भोसले त्याच मार्गाने वाटचाल करीत आहेत.शांत,संयमी व्यक्तीमत्व म्हणून सुरेशबाबांकडे पाहिले जाते.कृष्णाच्या गतकाळात अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना सुरेशबाबांनी "कृष्णा"ला आधुनिकतेची जोड दिली.नविन तंत्रज्ञानाचा स्विकार केला.भागात उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्दतेसाठी शिक्षणांचे विविध विभाग व ...

कला अकादमीवर कराडच्या मंगला बनसोडे यांची निवड

इमेज
कला अकादमीवर कराडच्या मंगला बनसोडे यांची निवड कराड दि22 (सावा) तमाशाच्या लोककलेला आपल्या सर्व कुटुंबानेच वाहून घेतले आहे. गेली ५५ वर्षे आपण या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील झाडाखालच्या तमाशापासून ते नाट्यगृहातील तमाशापर्यंत तमाशा मंडळे व त्यामधील कलाकारांना कोणत्या अडी-अडचणी येत असतात. त्यांच्या समस्या काय आहेत, याची आपणास माहिती आहे. या समस्या सोडविण्याला व तमाशा कलावंतांना मान-सन्मान प्राप्त करून देण्याला आपण समितीच्या माध्यमातून प्राधान्य देणार आहे. राज्यभरातील तमाशा कलावंत व शासन यांच्यामधील दुवा म्हणून आपण समितीमध्ये काम करणार आहे. त्यामुळे खर्‍या-खुर्‍या तमाशा कलावंतांना आपण न्याय मिळवून देऊ, असे मंगला बनसोडे-करवडीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आपल्या स्वत:च्या तमाशाव्दारे यावर्षीपासून 'लेक वाचवा' या विषयावर वगनाट्य सादर करून आपण राज्यभरात लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नितीन बनसोडे व अनिल बनसोडे-करवडीकर उपस्थित होते.राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाअंतर्गंत स्थापन करण्यात आलेल्या पु. ल. देशप...

संपादक-प्रकाशकांनी ऑनलाईन फाॅम भरावा - गोरख तावरे

इमेज
संपादक-प्रकाशकांनी ऑनलाईन फाॅम भरावा - गोरख तावरे कराड दि.(सावा) केंद्र शासनाच्या आरएनआय ला महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांनी प्रतीवर्षाप्रमाणे वार्षीक विवरण पाठवणे आवश्यक आहे.सध्या ऑनलाईन वार्षीक विवरण भरावे लागणार आहे.31 मे 2015 अंतीम तारीख आहे.तेव्हा दैनिक,साप्ताहिक,पाक्षीक,मासिक आणि अन्य प्रकाशित होणा-या वृत्तपत्रांच्या संपादक,प्रकाशकांनी वार्षीक विवरण ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.असे प्रसिध्दीपत्रकात प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे यांनी म्हटले आहे. www.rni.nic.in  या वेबसाईटवर ऑनलाईन फाॅर्म उपलब्द  आहे.काही अडचण आल्यास गोरख तावरे (9423502355 / 9326711721) यांच्याशी संपर्क साधावा विनामोबदला सहकार्य केले जाईल अशी हमी देवून पत्रकात म्हटले आहे की,काही तथाकथीत व्यक्ती संपादक व प्रकाशकांना फसवून ऑनलाईन फाॅर्म भरण्यासाठी पैशाची मागणी करीत आहेत यापासून सावध रहावे.विनाशुल्क ऑनलाईन फाॅर्म भरता येतो लेखा परिक्षकांचे पत्र सोबत जोडणे, अंक विक्रीची माहिती आवश्यक आहे.असेही पत्रकात म्हटले आहे.

३५0 रूपये कमी देणार्‍यांनी ऊस दरातील फरकाबद्दल बोलू नये - अविनाश मोहिते

इमेज
३५0 रूपये कमी देणार्‍यांनी ऊस दरातील फरकाबद्दल बोलू नये - अविनाश मोहिते कराड -कारखान्याच्या इतिहासात या पाच वर्षात सभासदांना मालकाचा दर्जा दिला.४८ हजार सभासदांना २ रु. किलो दराने साखर देणारा कृष्णा कारखाना एकमेव असून शेजारच्या कारखान्यापेक्षा ३५0 रुपये दर कमी देणार्‍यांनी ऊस दरातील फरकाबद्दल बोलू नये, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा कारखान्याचे चेअरमन अविनाश मोहिते यांनी केले. कार्वे, कोडोली (ता.कराड) येथे झालेल्या सभासद संपर्क दौर्‍यात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते अँड़ बाळासाहेब शेरेकर, कृषिमित्र अशोकराव थोरात, कारखान्याचे संचालक पोपटराव जाधव, जयशंकर यादव,उपस्थित होते. अविनाश मोहिते म्हणाले, १९८९ पासून कारखान्याचा कारभार सभासदांनी तपासून पहावा. सभासदांना सन्मानाची वागणूक कोणी दिली. २ रुपये दराने देण्यात येणारी साखर १४ रुपये दराने कोणी केली. इरिगेशन योजनांना १६ तास अखंडीत वीज कोणाच्या काळात मिळाली. कारखान्याच्या मालकीची १५७ एकर जमीन लाटण्याचा कोणी प्रय▪केला. सभासदांना दीर्घ आजारासाठी मदत कोणी दिली. इतर कारखान्याच्या बरोबरीत ऊस दर कोणी दिला. १00 रुपये फाइनल बिल कोणी बुडविले. या सर...

सामाजीक बांधिलकीतून प्रधानमंत्री जीवन सुरक्षा आणि जीवन ज्योती राबवणार - राजेश पाटील

इमेज
सामाजीक बांधिलकीतून प्रधानमंत्री जीवन सुरक्षा आणि जीवन ज्योती राबवणार - राजेश पाटील कराड(सावा)- कराड जनता बँकेने आपल्या सभासद आणि ग्राहकांसाठी अनेक योजना आणि उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविले आहेत. देशभरातील सर्वसामान्य नागरीक आणि शेतकरी बांधवांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या दोन्ही योजना कराड जनता बँक आपल्या सुमारे दीड लाखाहून अधिक ग्राहक आणि सभासदांसाठी प्रभावीपणे राबविणार आहे. नाममात्र किमतीमध्ये ही योजना विमाधारकांच्या कुटूंबांसाठी एक प्रकारचे दिलासा देणारे सुरक्षाकवचच असून विमा योजनांचा लाभ सर्वांनी बँकेच्या जवळच्या शाखेतून घ्यावा, असे आवाहन कराड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर यांनी केले. बँकेच्या मुख्य कार्यालयात या दोन्ही विमा योजनांचा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, उपाध्यक्ष विकासराव धुमाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विलासराव सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. विलासराव सुर्यवंशी यांनी विमा योजनांची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, प्रधानमंत्री जीवन सुरक्...

कृष्णा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.अतुल भोसले

इमेज
कृष्णा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.अतुल भोसले कराड, ता. 21 (सावा)कृष्णा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले, उपाध्यक्षपदी दामाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या मुख्य कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी एस. टी. गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडी जाहीर करण्यात आल्या. नूतन चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी सभासदांनी दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल आभार मानताना; कृष्णा बँकेला देशातील अग्रगण्य बँकेचा बहुमान पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय व्यक्त केला. कृष्णा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये नूतन संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून डॉ. अतुल भोसले, दामाजी मोरे, शिवाजी थोरात, प्रदीप थोरात, हर्षवर्धन मोहिते, प्रमोद पाटील, हणमंत पाटील, बाळासो पवार, रणजीत लाड, महादेव पवार, चंद्रहास जाधव, नामदेव कदम, महिला गटातून मालन जगताप,नंदाताई थोरात, अनुसूचित जाती गटातून तातोबा थोरात, विमुक्त जाती गटातून दिनकर गडाळे,इतर मागासप्रवर्गातून संतोष पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेचे मार्गदर्शक संचालक डॉ. सुरेश भोसले यांच्य...

...तर कृष्णेची चार स्वतंत्र युनिट असती! : डॉ. सुरेश भोसले

...तर कृष्णेची चार स्वतंत्र युनिट असती! : डॉ. सुरेश भोसले कराडदि (सावा)कृष्णा कारखान्यावर  योग्य नियोजन झाले असते तर गेल्या दहा वर्षांत कृष्णेचे नवीन युनिट स्थापन होऊन चार कारखाने झाले असते. इतकेच नव्हे, तर जरंडेश्‍वर आणि रयत साखर कारखानाही कृष्णेनेच चालविला असता; ते बंद पडू दिले नसते, असे मत कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन आणि सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केले. वाटेगाव (ता. वाळवा) येथे कृष्णा कारखाना सभासद व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बी. डी. पाटील होते. शेतकरी सभासदांना मार्गदर्शन करताना डॉ. भोसले म्हणाले, की ढिसाळ नियोजनामुळेच कृष्णा कारखाना सध्या अडचणीत आला आहे. कारखान्यावर जर चांगले नियोजन झाले असते तर कारखान्याचे विस्तारीकरण होऊन शाखा झाल्या असत्या. 1999 साली आम्ही सत्तेवर आल्यावर कारखान्याचा विस्तार केला. पण त्यानंतर मात्र कारखान्यावर आलेल्या सत्ताधार्‍यांनी मात्र कारखान्याचा कोणताही विस्तार न केल्यास कारखान्याची प्रगती खुटली आहे. आम्ही निवडणुकीत उतरलो कारण गेल्या काही वर्षात कारखाना अडचणीत आला आहे. प्रशासन कोलमडले ...

सातारा जिल्हयात राजकीय वातावरण तापले

सामना - 3/5/2015 कराड वार्तापत्र - गोरख तावरे सातारा जिल्हयात राजकीय वातावरण तापले सातारा जिल्हयात सध्या जिल्हा मध्यवर्ती बॅक निवडणूक,आगामी कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक,पालकमंत्री विजय शिवतारे यांचा शिवसैनिकांना पांठीबा व दिलासा आणि शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचा युती शासनाच्या माध्यमातून विकासाचा नवा आयाम अशा विविध घडामोडीमुळे राजकीय वातावरण गतीमान झाले आहे.बेरजेचे राजकारण व शह- काटशह आणि आरोप-प्रत्यारोंपाचा माहोल जोरदार सुरू आहे. जिल्हा बॅकेच्या संचालक पदासाठी वजनदार राजकीय लोकांनी प्रतिष्ठापणाला लावली तर सत्तेत आपणच कायम पाहिजे यासाठी तडजोडी केल्या पक्षीय मुखवटे बाजूला सारले गेले तर राष्ट्रवादीने निष्ठावंताना बाजूला ठेवले.जेष्ठ नेते विलासकाका पाटील यांच्या अधिपत्याखाली असणारी जिल्हा बॅक राष्ट्रवादीने ताब्यात घेतल्यापासून रामराजे निंबाळकर व लक्ष्मणतात्या पाटील संयुक्त नेतृत्व करीत आहेत.यावेळी श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी नवोदितांना संधी देण्याची भूमिका घेतल्याने प्रस्तापितांच्या 'असे काही नको'या भूमीकेमुळे काही जागा बिनविरोध झाल्या आहेत.बैठका, चर्चा मनधरणी ...