महावितरण कंपनीचा ग्राहकांना मनस्ताप
ग्राहकांची पिळवणूक थांबवावी - एकनाथ बागडी कराड (लक्ष्मीपुत्र) - कोरोनामुळे तीन महिन्यांपासून सर्वत्र महासंकट चालू असून या कालावधीत वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव वीज बील येत असल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे. महावितरण कंपनी मनमानी कारभार करत असल्याने बीलामुळे ग्राहकांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड शहर प्रमुख एकनाथ बागडी यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे केली आहे. महावितरणने अंदाजे रिडिंग घेऊन बिले देण्यापेक्षा चालू रीडिंग बिले घेतल्या शिवाय नागरिकांची वीज बीले तयार करू नयेत. वाढीव विज बीले आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून वीज बील भरणा करण्यासाठी व वीज बीलाची रक्कम कमी करून घेण्यासाठी कंपनीमार्फत अर्ज भरण्यास सांगितले जात आहे. यामुळे वीज बील भरणा केंद्रावर नागरिकांच्या रांगा वाढत असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. सदर सर्व बाबींचा विचार करून कोरोना काळातील वीज बीले माफ करावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टी कर...