पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनात देशात "सह्याद्रि" अव्वल

इमेज
कराड - पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकाराचे जाळे सकारात्मक दृष्टीने चांगले विणले गेले आहे. कराड तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यकारी सोसायटी प्रत्येक गावात कार्यरत आहेत. दूध संस्था, पतसंस्था, सहकारी बँका आणि सहकारी साखर कारखाने कार्यक्षमपणे काम करताहेत. सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कृष्णा सहकारी साखर कारखाना, रयत सहकारी साखर कारखाना, व खाजगी जयवंत शुगर हे चार साखर कारखाने शेतकऱयांचा ऊस गाळप करून त्यांना अधिक चांगला दर देण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर सह्याद्री सहकारी साखर कारखाना आहे. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास सन २०१७-१८ सालासाठी देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार मिळालेला आहे. नुकताच नवी दिल्ली येथे सन्मानपूर्वक "सह्याद्री"ला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पनेतून सह्याद्री कारखान्याची निर्मिती झाली आणि याची पूर्ण जबाबदारी स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी इमाने इतबारे सह्याद्री कारखान्याची निकोप वाढ केली आणि सह्याद्री कारखान्याने कार्यक्षेत्रात...

कराड उत्तरची कासवगतीने; तर दक्षिणची हालचाल गतीमान

इमेज
सातारा जिल्ह्यात दोन विधानसभा मतदारसंघ असणारा कराड तालुका हा एकमेव तालुका आहे. कराड दक्षिण व कराड उत्तर अशी या विधानसभा मतदारसंघाची विभागणी झालेली आहे. उत्तर मतदार संघापेक्षा कराड दक्षिण मतदारसंघात राजकीय हालचाली नेहमीच जोरदारपणे सुरू असतात. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गटातील टोकाचे मतभेद सर्वश्रूत आहेत. कराड उत्तरमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात मनोज घोरपडे व धैर्यशील कदम सातत्याने धडका देत आहेत.   कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ तीन तालुक्यांमध्ये विभागलेला मतदार संघ आहे. कराड, कोरेगाव, सातारा या तालुक्यांचा समावेश या मतदार संघात आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय आदरणीय पी. डी. पाटील यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या वीस वर्षांपासून आमदार बाळासाहेब पाटील हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कराड उत्तर मतदार संघात राजकीय संघर्ष आहे. पण तो अतिशय टोकाला कधीही जात नाही. ठराविक मर्यादेपर्यंत आरोप - प्रत्यारोप होतात, प्रश्नाला उत्तर दिले जाते दरम्यान भाषेच...