उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनात देशात "सह्याद्रि" अव्वल
कराड - पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकाराचे जाळे सकारात्मक दृष्टीने चांगले विणले गेले आहे. कराड तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यकारी सोसायटी प्रत्येक गावात कार्यरत आहेत. दूध संस्था, पतसंस्था, सहकारी बँका आणि सहकारी साखर कारखाने कार्यक्षमपणे काम करताहेत. सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कृष्णा सहकारी साखर कारखाना, रयत सहकारी साखर कारखाना, व खाजगी जयवंत शुगर हे चार साखर कारखाने शेतकऱयांचा ऊस गाळप करून त्यांना अधिक चांगला दर देण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर सह्याद्री सहकारी साखर कारखाना आहे. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास सन २०१७-१८ सालासाठी देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार मिळालेला आहे. नुकताच नवी दिल्ली येथे सन्मानपूर्वक "सह्याद्री"ला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पनेतून सह्याद्री कारखान्याची निर्मिती झाली आणि याची पूर्ण जबाबदारी स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी इमाने इतबारे सह्याद्री कारखान्याची निकोप वाढ केली आणि सह्याद्री कारखान्याने कार्यक्षेत्रात...