लढाई सुरू....सहभागी व्हावे. वृत्तपत्रसंबंधाने राज्य शासनाने 2001 साली धोरण जाहिर केले आहे.वृत्तपत्रांची व्याख्या केली आहे.दैनिक,सायं.दैनिक,साप्ताहिक व मासिक यांचा आकार किती असावा आणि पानांची संख्या निश्चित केले आहे.तर वृत्तपत्रांच्या अंक विक्री कशी आहे यानुसार वृत्तपत्राचे वर्ग ठरवले आहेत.अ ब क अशी तीन वर्गात वर्गवारी केली आहे.अ आणि ब वर्गाला ज्यापध्दतीने शासन न्याय देत आहे.याउलट क वर्गाला नेहमी उपेक्षीत ठेवले जात आहे.यामुळे वृत्तपत्रांबाबत शासनाची न्याय भूमिका दिसून येत नाही.क वर्ग वृत्तपत्र हे महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागातून प्रसिध्द होत असतात.राज्य शासनाचे विविध उपक्रम,योजना,शासनाची सकारात्मक प्रसिध्दी,मंत्रीमहोदयांचे कार्यक्रम,भाषणे व फोटो सविस्तर क वर्गातील वृत्तपत्रे ठळक प्रसिध्दी देतात.ही वस्तुस्थिती आहे. सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असो. सर्वांना न्याय समान दिला पाहिजे ही रास्त अपेक्षा आहे.पण खरे झारीतील शुक्राचार्य कोण ? हे शोधून आता क वर्ग वृत्तपत्र मालक व संपादकांनी लढाई सुरू केली पाहिजे.आम्ही जेष्ठ संपादक आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष लढ...