पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जयंत पाटील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी निवडीमुळे कराडचा ही झाला सन्मान !

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वाळव्याचे आमदार जयंत पाटील यांची निवड झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. कारण जयंत पाटील यांनी आतापर्यंत राजकारण व समाजकारणात केलेले काम उल्लेखनीय व दिशादर्शक आहे. यामुळे भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील असेही बोलले जात आहे. कराडला लागून वाळवा तालुका असल्यामुळे कराड - वाळवा तालुक्यात राजकीय सुंदोपसुंदी तसेच बेरजेचे राजकारण दोन्ही तालुक्यात चालत असते. गतकाळातील कराड लोकसभा मतदार संघांत वाळवा तालुका होता, यामुळे कराडमधील राजकीय लोकांचे वाळवा तालुक्यात अतिशय चांगले संबंध आहेत. तर कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रही वाळवा तालुक्यातील काही गावांमध्ये आहे. अतिशय पारदर्शक, काटकसरीने संस्था चालवण्याचा आमदार जयंत पाटील यांचा हातखंडा आहे. अनावश्यक खर्च टाळून संस्थांचा आर्थिक विकास करण्यात त्यांचा कोणी हात धरू शकणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आमदार जयंत पाटील यांनी महत्त्वाची मंत्रिपदे भुसविली आहेत. आणि प्रत्येक मंत्रीपद भूषवताना त्यांनी त्यांच्या खात्याचा दर्जा उंचावला आहे. राष्ट्रीय काँग्र...

मलकापूरच्या जनतेचा कौल कोणाला ? नगरपालिकेला कोण करतोय विरोध ?

इमेज
मलकापूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यानिमित्ताने आता राजकीय फड रंगू लागला आहे. अल्पावधीत विकास कामे करण्याची सर्व मर्यादा मलकापूर नगरपंचायतीने ओलांडल्या आहेत. माजी आमदार भास्करराव शिंदे यांच्या स्वप्नातील मलकापूर सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न विद्यमान उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे करीत आहेत. निवडणुकीपुरते राजकारण करणारे मनोहर शिंदे इतर वेळी सर्वांच्या बरोबर एक दिलाने कारभार करीत असतात. मलकापूर ग्रामपंचायतीचे मलकापूर नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यामध्ये उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. मलकापूर नगरपंचायतीचे मलकापूर नगरपालिकेत रूपांतर व्हावे यासाठी मनोहर शिंदे कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मलकापूर नगरपालिकेसाठी आवश्यक असणारे सर्व प्रस्ताव, कागदपत्रांची पूर्तता केली गेली आहे. राज्य शासनाची मान्यताही मिळेल असे मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली आहे. दरम्यान मलकापूर नगरपालिकेचे श्रेयवाद रंगतोय, असे सध्या दिसून येत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी भारतीय जनता पार्टीच्यावतीने शासनाकडे मलकापूरला नगरपालिकेचा...

आमदार असावा तर असा

इमेज
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाला एक ऐतिहासिक परंपरा आहे. सकारात्मक विचारांनी येथे काम करण्याची प्रथा आहे. सर्वसामान्य नागरिकांना व समाजातील शेवटच्या घटकालाही आदरातिथ्य बोलण्याची आणि त्याला सन्मान देण्याचे सौजन्य आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब, आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांचा वसा अन वारसा या मतदारसंघाला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदार, नागरिक स्वाभिमानी आहे. आदरणीय स्वर्गीय पी.डी. पाटीलसाहेब अनेक वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. गेल्या वीस वर्षांपासून कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व आमदार बाळासाहेब पाटील करीत आहेत. आगामी निवडणुकांची चाहूल लागताच, आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी हालचाल करीत आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना समान अधिकार आहे. कोणीही कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढवू शकतो. परंतु केवळ निवडणुकांपुरतेच मतदार संघात फिरणारे तथाकथित अनेक राजकीय मंडळी आहेत. गेल्या वीस वर्षांपासून आमदार आमदार बाळासाहेब पाटील यांचा कराड उत्तर विधानसभा मतदार संघात प्रभाव आहे.  त्यांचा शांत, संयमी स्वभाव ...

नराधमांना फाशीच हवी

इमेज
जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथील 8 वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार म्हणजे मानवतेला काळींबा आहे. अशा नराधमांना जाहीर चौकांमध्ये फाशी दिली गेली पाहिजे, अशी लोकभावना निर्माण झाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद विविध स्तरातून उमटले आहेत. लोकभावना तीव्र झाली आहे. नराधमांनी कृत्य केले त्यांना फाशीच झाली पाहिजे. असा आग्रह धरला जात आहे. आणि अशा विकृत नराधमांना फाशीच झाली पाहिजे. या व्यतिरिक्त त्यांना कोणतीही शिक्षा दिली गेली नाही पाहिजे. देशातील सरकारकडून फाशीच्या शिक्षेची जनभावना अपेक्षा करीत असताना, देशाचे प्रधानमंत्री लंडनस्थित जाऊन याबाबत भाष्य करतात, याला काय म्हणावे ? ज्या हिंदुस्थानातील तमाम जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून निवडून दिले. त्या लोकांचेसमोर येवून या घटनेबद्दल वक्तव्य करण्याऐवजी लंडनला जाऊ याबाबत बोलणे योग्य नाही. फाशीच्या शिक्षेबद्दल बोलले असते, तर योग्य ठरले असते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनी याबाबत राजकारण करू नये, असे म्हटले आहे. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यामध्ये केवळ राजकारणच आहे. असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ ...

शेतकऱ्यांनी सोनालिका ट्रॅक्टरला पसंती - कुलदीप पारीख व्ही. जी. थोरात एजन्सीचे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भक्कम स्थान

इमेज
कराड  (लक्ष्मीपुत्र) - शेतकऱ्यांनी सोनालिका ट्रॅक्टरला पसंती दिल्याने 2017-18 मध्ये सोनालिका सोनालिका कंपनीचे 1 लाख ट्रॅक्टर वितरीत केले आहेत असे कंपनीचे एरिया मॅनेजर कुलदीप पारीख म्हणाले. सोनालिका कंपनीचे डेमोस्टेटर जुबेर मुल्ला, उदय थोरात, किरण थोरात, पत्रकार गोरख तावरे, सतीश मोरे, सचिन देशमुख,शशिकांत पाटील, प्रमोद सुकरे,विकास भोसले,संभाजी थोरात, प्रकाश पिसाळ, माणिक डोंगरे, वैभव पाटील, आकाश सोरटे, शंकर गोडसे यांची उपस्थिती होती.आजअखेर व्ही. जी. थोरात एजन्सीने शेतकऱ्यांच्या मनामध्ये भक्कम असे स्थान निर्माण केलेले आहे. सर्वोत्तम सेवा व संतुष्ट ग्राहक हेच आमचे ध्येय असलेने व्ही. जी. थोरात एजन्सीने शेतकऱ्यांची एजन्सी आहे. अल्पावधीत उद्योजक उदय थोरात यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. सत्याची कास धरून उदय थोरात करत असलेल्या शेतकरी हिताचे कामांना यश प्राप्त झाले आहेत. असे मनोगत पत्रकार सतीश मोरे यांनी व्यक्त केले. शेतकरी डोळ्यासमोर ठेवून उदय थोरात यांनी शेतकर्यांना उपयुक्त असे ट्रॅक्टरसहीत इतर साधन यंत्रांचा उद्योग सुरू करून यामध्ये धवल यश संपादन केले यासाठी उदय थोरात यांची व्यव...