पेड न्यूज - खंडणी वसुली
पत्रकारितेत सध्या काय चालले आहे ? पेड न्यूज ,खंडणी वसुली ,बातमी छापायला आणि न छापायला भिकार्डी पत्रकारांची फौज निर्माण करणारी संपादक मंडळी कशाचाही मुलाहिजा न ठेवता ,गावो -गावी खंडणी
वसुली करणारी माणसांची पत्रकार म्हणून नेमणूक करीत आहेत. टीळक - आगरकरांची
पत्रकारिता राहिली नाही . हे मान्य, मात्र अलीकडच्या काळातील एखाद्या
चांगल्या संपादकाचा वारसा सांगावे , असे नाव नाही ,असे नाही पण
वारसदारानीच खंडणी वसुलीचा धंदा सुरु केल्यावर नाव घ्यायला प्रामाणिक
पत्रकारांना लाज वाटते आहे . प्रामाणिक पत्रकारिता करणारे स्वाभिमानाने काही पत्रकार टीळक - आगरकरांचे नाव घेतात ही चांगली बाब होय .समाजातील गुन्हेगारीतेवर लिहिताना आपण काय करतो आहोत याचे भान खंडणी
वसुली करणारी वृत्तपत्र ठेवत नाहीत ,आपणाकडील खंडणीबाबतचे लक्ष विचलित
करण्यात हे संपादक - पत्रकार माहीर आहेत .गुन्हेगारीचे मी समर्थन करीत
नाही, पण उखळ माथ्याने पत्रकारितेचा वापर करीत खंडणी वसुली करणारे विकृत संपादक - पत्रकार समाजाची दिशाभूल करीत आहेत ,हि घातकवृत्ती स्वहितासाठी
काहीही करतात .याची CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे. सर्व प्रथम साक्ष देतील
राजकीय मंडळी ,कारण निवडणुका लागल्या रे लागल्या की , खंडणी वसुली करणारी संपादक - पत्रकार मंडळी पेड न्यूजच्या नावाखाली वसुली सुरु करतात .हे सत्य समाजासमोर आले पाहिजे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा