जयवंत शुगरचा तृतीय गळीत हंगाम शुभारंभ झाला असून तीन लाख टन ऊसाचे गाळप
करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे.डॉ. सुरेश भोसले म्हणाले ,एकरी १०० टन
उत्पादन घेण्यासाठी शेतकरी यांनी प्रयत्न करावा .डॉ.अतुल भोसले म्हणाले
,तारळी येथे आठ टी. एम.सी. चे धरणामुळे वीस हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. शेतकरी व लोकांचा फायदा करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,सभासद व शेतकरी यांनी सहकार्य करावे .
आगंतुकपणे भेटले प्रा. आप्पासाहेब खोत आगंतुकपणे आज माझ्यासमोर प्रा. आप्पासाहेब खोत उभा राहिले. आणि तुम्ही माझ्याच कुळातले दिसता असे म्हणाले. हो, मी दैनिक सामनाचा पत्रकार आहे. असे त्यांना सांगितले. आणि थोडा वेळ गप्पा मारल्या. नेहमी प्रमाणे हॉटेल "लक्ष्मी" मध्ये काऊन्टरवर मी बसलो होतो. सुरुवातीला एक सदग्रस्त आले, आणि आपल्याकडे जेवण मिळते का ? अशी चौकशी केली. शाकाहारी राईसप्लेट मिळेल. असे मी त्यांना सांगितले. पुढे गाडी लावली आहे; आम्ही दोघे जण आहोत, आलोच जेवायला, असे म्हणते ते, सदग्रस्त गाडीकडे गेले. आणि ते "दोघे" येऊन हॉटेलमध्ये बसले. त्यांनी शाकाहारी जेवण केले. तृप्तपणे जेवण झाले, बिल देण्यासाठी कौंटरवर आले. त्यांनी बिलाचे पैसे दिले. आणि मी ते पैसे घेतले. एक नजर त्यांच्याकडे टाकली. तर क्षणभर मला ते सदग्रस्त ओळखीचे वाटले, पण मी काही बोललोच नाही. परंतु मी प्रेसनोट मोबाइलवर टाइप करत असताना त्यांनी पाहिले आणि ते म्हणाले, तुम्ही माझ्या कुळातले दिसता. तुमचे नाव काय ? असे त्यांनी मला विचारले, मी म्हणालो, गोरख तावरे. हे काय करताय ? मला आवर्जून विचारले. मी म्हणालो, ...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा