कराड -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचा कारभार स्वीकारल्यानंतर अनेकांना शंका होती कि ,राज्यातील प्रश्नाचा त्यांना अनुभव नाही ,आघाडीचे सरकार कसे चालविणार ? मात्र गेल्या दोन वर्षात जे निर्णय घेतले ,लोकांची कामे केली ,अनेक अडचणी आल्या त्याच्यावर बाबानी मात केली .आणि आपली क्षमता दाखऊन दिली आहे .यामुळे राजकारणातील मात्तबर अव्वाक झाली आहेत राजकीय निरीक्षकाना हे कोडे लवकर उलघडले नाही. म्हणून थोडे सोपे करून सांगतो आहे , कराडच्या मातीचा गुण हा प्रामाणिक ,पारदर्शक ,निस्वार्थी काम करण्याचा आहे .सुधारककार गोपाळ गणेश आगरकर ,यशवंतराव चव्हाण यांची नावे अभिमानाने घेतली जातात .अशा महान विभूतीनच्या कर्मभूमीतील पृथ्वीराज चव्हाण (बाबा) आहेत .जनहितासाठी चांगले निर्णय घेताना मागे हटत नाहीत .मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण( बाबा )राज्याला मिळालेली देणगी आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही .
आगंतुकपणे भेटले प्रा. आप्पासाहेब खोत आगंतुकपणे आज माझ्यासमोर प्रा. आप्पासाहेब खोत उभा राहिले. आणि तुम्ही माझ्याच कुळातले दिसता असे म्हणाले. हो, मी दैनिक सामनाचा पत्रकार आहे. असे त्यांना सांगितले. आणि थोडा वेळ गप्पा मारल्या. नेहमी प्रमाणे हॉटेल "लक्ष्मी" मध्ये काऊन्टरवर मी बसलो होतो. सुरुवातीला एक सदग्रस्त आले, आणि आपल्याकडे जेवण मिळते का ? अशी चौकशी केली. शाकाहारी राईसप्लेट मिळेल. असे मी त्यांना सांगितले. पुढे गाडी लावली आहे; आम्ही दोघे जण आहोत, आलोच जेवायला, असे म्हणते ते, सदग्रस्त गाडीकडे गेले. आणि ते "दोघे" येऊन हॉटेलमध्ये बसले. त्यांनी शाकाहारी जेवण केले. तृप्तपणे जेवण झाले, बिल देण्यासाठी कौंटरवर आले. त्यांनी बिलाचे पैसे दिले. आणि मी ते पैसे घेतले. एक नजर त्यांच्याकडे टाकली. तर क्षणभर मला ते सदग्रस्त ओळखीचे वाटले, पण मी काही बोललोच नाही. परंतु मी प्रेसनोट मोबाइलवर टाइप करत असताना त्यांनी पाहिले आणि ते म्हणाले, तुम्ही माझ्या कुळातले दिसता. तुमचे नाव काय ? असे त्यांनी मला विचारले, मी म्हणालो, गोरख तावरे. हे काय करताय ? मला आवर्जून विचारले. मी म्हणालो, ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा